Energy drinks : शाळा, कॉलेज परिसरात एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी!

  235

राज्य सरकारकडून मंत्री धर्मराव बाबा आत्रामांची मोठी घोषणा


मुंबई : एनर्जी ड्रिंक्स (Energy drinks) हा सध्याची तरुणाई आणि लहान मुलांमध्ये आवडीचा विषय आहे. बॉलिवूडचे टॉपचे अनेक हिरो या एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिराती (Advertisement) करतात, ज्यातून तुम्हाला हे ड्रिंक्स प्यायल्याने ताजंतवानं राहता येईल, असं सांगितलं जातं. त्यामुळे तरुणवर्ग साहजिकच याकडे आकर्षित होतो. या ड्रिंक्सच्या बॉटल्सवर अनेकदा १८ वर्षांखालील मुलांनी सेवन करु नये, असं लिहिलेलं असतं. मात्र, तरीही लहान मुलांकडूनही मोठ्या प्रमाणात याचं सेवन केलं जातं. हे टाळण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री होत असल्याने शाळेतील मुलांना ते सहज उपलब्ध होत आहे. राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. आमदार सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या मुद्द्यावर राज्य सरकारकडून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शाळा परिसरात ५०० मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे जाहीर केले.


राज्यातील सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात कॅफेनयुक्त पेय तसेच नशेच्या गोळ्या बाजारात विक्रीसाठी सहज उपलब्ध आहेत. तरुण वर्गासोबतच लहान मुलेदेखील याकडे आकर्षित होत आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात एनर्जी ड्रिंक्स सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एनर्जी ड्रिंक्सचा प्रसार केला जातो. एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवरही सरकारने बंदी घालावी. तसेच शाळा परिसरात कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालून योग्य कार्यवाही करावी. याबाबत संबधित अधिका-यांसोबत एक बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.



शाळा परिसरात एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी


सत्यजीत तांबेंच्या मागणीवर सभापती नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त करीत येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आदेश संबंधित मंत्री आणि प्रशासनाला दिले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शाळा परिसरात ५०० मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांवर (एनर्जी ड्रिंक्स) तातडीने बंदी घालण्यात येईल. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.