Central railway : दुष्काळात तेरावा महिना! माटुंगा मध्य रेल्वे स्थानकावर रुळाला तडे

  82

पावसामुळे मध्य रेल्वे धिम्या गतीने चालत असतानाच आता होणार आणखी उशीर


मुंबई : गेले काही दिवस मुंबईसह उपनगरांत पावसाने (Heavy rainfall) जोर धरला आहे. थोडा काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरुच आहे. याचा मध्य रेल्वेला (Central railway) मोठा फटका बसत आङे. स्थानकांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची सेवा धिम्या गतीने चालू आहे. त्यामुळे प्रवासी आधीच वैतागलेले असताना आता आणखी एका गोष्टीमुळे प्रवाशांना उशीर होणार आहे. माटुंगा रेल्वे स्थानक (Matunga Railway station) येथे रुळाला तडे गेले आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.


माटुंगा येथे डाउन धिम्या मार्गावरील रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे धिम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. दरम्यान रेल्वे रुळाची तात्पुरती डागडुजी करून धिम्या मार्गावरून लोकल सुरू करण्यात आली आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब समोर आल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. धिम्या मार्गावरील लोकल सेवा ७ ते १० मिनिटे उशिराने धावत आहे.


कल्याण धिम्या लोकल लोको पायलटला रुळाला तडा गेल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती कंट्रोलला दिली. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे रुळाला गेलेल्या तड्याची डागडुजी करण्यात आली. दुपारी एकच्या दरम्यान रुळाला तडा गेल्याचं समोर आलं होतं. १.४० पर्यंत स्लो ट्रॅक वरून पुन्हा लोकल सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात डाउन स्लो मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. तरीही या वाहतुकीवर परिणाम झाला असून सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवा ७ ते १० मिनिट उशिराने सुरू आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.