Central railway : दुष्काळात तेरावा महिना! माटुंगा मध्य रेल्वे स्थानकावर रुळाला तडे

पावसामुळे मध्य रेल्वे धिम्या गतीने चालत असतानाच आता होणार आणखी उशीर


मुंबई : गेले काही दिवस मुंबईसह उपनगरांत पावसाने (Heavy rainfall) जोर धरला आहे. थोडा काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरुच आहे. याचा मध्य रेल्वेला (Central railway) मोठा फटका बसत आङे. स्थानकांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची सेवा धिम्या गतीने चालू आहे. त्यामुळे प्रवासी आधीच वैतागलेले असताना आता आणखी एका गोष्टीमुळे प्रवाशांना उशीर होणार आहे. माटुंगा रेल्वे स्थानक (Matunga Railway station) येथे रुळाला तडे गेले आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.


माटुंगा येथे डाउन धिम्या मार्गावरील रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे धिम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. दरम्यान रेल्वे रुळाची तात्पुरती डागडुजी करून धिम्या मार्गावरून लोकल सुरू करण्यात आली आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब समोर आल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. धिम्या मार्गावरील लोकल सेवा ७ ते १० मिनिटे उशिराने धावत आहे.


कल्याण धिम्या लोकल लोको पायलटला रुळाला तडा गेल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती कंट्रोलला दिली. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे रुळाला गेलेल्या तड्याची डागडुजी करण्यात आली. दुपारी एकच्या दरम्यान रुळाला तडा गेल्याचं समोर आलं होतं. १.४० पर्यंत स्लो ट्रॅक वरून पुन्हा लोकल सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात डाउन स्लो मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. तरीही या वाहतुकीवर परिणाम झाला असून सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवा ७ ते १० मिनिट उशिराने सुरू आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,