Central railway : दुष्काळात तेरावा महिना! माटुंगा मध्य रेल्वे स्थानकावर रुळाला तडे

पावसामुळे मध्य रेल्वे धिम्या गतीने चालत असतानाच आता होणार आणखी उशीर


मुंबई : गेले काही दिवस मुंबईसह उपनगरांत पावसाने (Heavy rainfall) जोर धरला आहे. थोडा काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरुच आहे. याचा मध्य रेल्वेला (Central railway) मोठा फटका बसत आङे. स्थानकांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची सेवा धिम्या गतीने चालू आहे. त्यामुळे प्रवासी आधीच वैतागलेले असताना आता आणखी एका गोष्टीमुळे प्रवाशांना उशीर होणार आहे. माटुंगा रेल्वे स्थानक (Matunga Railway station) येथे रुळाला तडे गेले आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.


माटुंगा येथे डाउन धिम्या मार्गावरील रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे धिम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. दरम्यान रेल्वे रुळाची तात्पुरती डागडुजी करून धिम्या मार्गावरून लोकल सुरू करण्यात आली आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब समोर आल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. धिम्या मार्गावरील लोकल सेवा ७ ते १० मिनिटे उशिराने धावत आहे.


कल्याण धिम्या लोकल लोको पायलटला रुळाला तडा गेल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती कंट्रोलला दिली. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे रुळाला गेलेल्या तड्याची डागडुजी करण्यात आली. दुपारी एकच्या दरम्यान रुळाला तडा गेल्याचं समोर आलं होतं. १.४० पर्यंत स्लो ट्रॅक वरून पुन्हा लोकल सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात डाउन स्लो मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. तरीही या वाहतुकीवर परिणाम झाला असून सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवा ७ ते १० मिनिट उशिराने सुरू आहे.

Comments
Add Comment

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक