Mumbai Railway : मध्य रेल्वे स्थानकात आता साचणार नाही पाणी; मात्र...

प्रशासनाने घेतला 'हा' मोठा निर्णय!


मुंबई : तीन दिवसांपूर्वी राज्यभरात जोरदार अतिवृष्टी (Maharashtra Rain) झाल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले होते. त्यानंतर काहीकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. याचा फटका नेहमीप्रमाणे रेल्वे लोकलवर (Local Train) पडला असल्याचे दिसून येत आहे. आजही सकाळपासून झालेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकांजवळ पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रवाशांची होणारी कोंडी पाहता मध्य रेल्वेने स्थानकांवर पाणी न साचण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मध्यरात्री ते पहाटेपर्यंतच्या ६ तासांमध्ये ३०० मिमीची नोंद झाली. यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने चुनाभट्टी स्थानकातील रूळ पाण्याखाली गेले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चुनाभट्टी स्थानकातील फलाटालगत असलेल्या सीएसएमटीकडे आणि पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे रुळांची उंची २ ते ४ इंचांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासोबत ओव्हरहेड वायरच्या रचनेतही बदल करण्यात येणार आहे.



'या' स्थानकांची उंची वाढवणार


सीएसएमटीकडे जाणाऱ्या ४४० मीटर लांबीच्या आणि पनवेलकडे जाणाऱ्या ३५० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्या १०० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या अत्याधुनिक मशिनच्या मदतीने उंची वाढवण्यात येत असून येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव चुनाभट्टी स्थानक परिसरात वेगमर्यादेसह लोकल धावत्या राहणार आहेत, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.



फलाटांची उंचीही वाढणार


रुळांची उंची वाढवल्यानंतर लोकल डब्याचे पायदान आणि फलाट यांच्यातील अंतर वाढते. यामुळे मोठ्या प्रमाणात उंची वाढवताना मर्यादा येतात. पायदान आणि फलाटातील अंतर कमी करण्यासाठी फलाटांची उंचीही वाढवण्याचे नियोजन आहे. यासाठी साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे