Mumbai Railway : मध्य रेल्वे स्थानकात आता साचणार नाही पाणी; मात्र...

प्रशासनाने घेतला 'हा' मोठा निर्णय!


मुंबई : तीन दिवसांपूर्वी राज्यभरात जोरदार अतिवृष्टी (Maharashtra Rain) झाल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले होते. त्यानंतर काहीकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. याचा फटका नेहमीप्रमाणे रेल्वे लोकलवर (Local Train) पडला असल्याचे दिसून येत आहे. आजही सकाळपासून झालेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकांजवळ पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रवाशांची होणारी कोंडी पाहता मध्य रेल्वेने स्थानकांवर पाणी न साचण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मध्यरात्री ते पहाटेपर्यंतच्या ६ तासांमध्ये ३०० मिमीची नोंद झाली. यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने चुनाभट्टी स्थानकातील रूळ पाण्याखाली गेले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चुनाभट्टी स्थानकातील फलाटालगत असलेल्या सीएसएमटीकडे आणि पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे रुळांची उंची २ ते ४ इंचांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासोबत ओव्हरहेड वायरच्या रचनेतही बदल करण्यात येणार आहे.



'या' स्थानकांची उंची वाढवणार


सीएसएमटीकडे जाणाऱ्या ४४० मीटर लांबीच्या आणि पनवेलकडे जाणाऱ्या ३५० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्या १०० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या अत्याधुनिक मशिनच्या मदतीने उंची वाढवण्यात येत असून येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव चुनाभट्टी स्थानक परिसरात वेगमर्यादेसह लोकल धावत्या राहणार आहेत, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.



फलाटांची उंचीही वाढणार


रुळांची उंची वाढवल्यानंतर लोकल डब्याचे पायदान आणि फलाट यांच्यातील अंतर वाढते. यामुळे मोठ्या प्रमाणात उंची वाढवताना मर्यादा येतात. पायदान आणि फलाटातील अंतर कमी करण्यासाठी फलाटांची उंचीही वाढवण्याचे नियोजन आहे. यासाठी साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात सूतक काळ लागू होणार की नाही? घ्या जाणून....

मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी लागणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

Maharashtra Rain: राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई (वार्ताहर) : राज्यातील काही भागात मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या ते मध्यम

ठाणे, कडोंमपाची जबाबदारी राज ठाकरेंवर; उबाठा गट मुंबईवरच लक्ष ठेवणार!

मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चर्चा रंगलेली असतानाच या दोन्ही भावांमध्ये मुंबई आणि ठाणे

मराठीचा टेंभा मिरवणारे मनसे नेते संदीप देशपांडे भाजपकडून ट्रोल

स्वत:च्या हॉटेलातही मराठी आचारी नाही मुंबई : मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्रांना न्याय या

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

पर्यटन आणि उद्योगांना चालना मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान