Mumbai Railway : मध्य रेल्वे स्थानकात आता साचणार नाही पाणी; मात्र…

Share

प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई : तीन दिवसांपूर्वी राज्यभरात जोरदार अतिवृष्टी (Maharashtra Rain) झाल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले होते. त्यानंतर काहीकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. याचा फटका नेहमीप्रमाणे रेल्वे लोकलवर (Local Train) पडला असल्याचे दिसून येत आहे. आजही सकाळपासून झालेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकांजवळ पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रवाशांची होणारी कोंडी पाहता मध्य रेल्वेने स्थानकांवर पाणी न साचण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मध्यरात्री ते पहाटेपर्यंतच्या ६ तासांमध्ये ३०० मिमीची नोंद झाली. यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने चुनाभट्टी स्थानकातील रूळ पाण्याखाली गेले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चुनाभट्टी स्थानकातील फलाटालगत असलेल्या सीएसएमटीकडे आणि पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे रुळांची उंची २ ते ४ इंचांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासोबत ओव्हरहेड वायरच्या रचनेतही बदल करण्यात येणार आहे.

‘या’ स्थानकांची उंची वाढवणार

सीएसएमटीकडे जाणाऱ्या ४४० मीटर लांबीच्या आणि पनवेलकडे जाणाऱ्या ३५० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्या १०० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या अत्याधुनिक मशिनच्या मदतीने उंची वाढवण्यात येत असून येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव चुनाभट्टी स्थानक परिसरात वेगमर्यादेसह लोकल धावत्या राहणार आहेत, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

फलाटांची उंचीही वाढणार

रुळांची उंची वाढवल्यानंतर लोकल डब्याचे पायदान आणि फलाट यांच्यातील अंतर वाढते. यामुळे मोठ्या प्रमाणात उंची वाढवताना मर्यादा येतात. पायदान आणि फलाटातील अंतर कमी करण्यासाठी फलाटांची उंचीही वाढवण्याचे नियोजन आहे. यासाठी साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

23 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago