IND vs SL: हार्दिक कर्णधार आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बाहेर, श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडिया

मुंबई: झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया(team india) श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेत भारतीय संघाला तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तितकेच वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार असू शकतो. तर जसप्रीत बुमराहला या मालिकेत आराम मिळू शकतो. याशिवाय शिवम दुबेही या मालिकेतून बाहेर होऊ शकतो.


झिम्बाब्वेविरुद्ध संघाबाबत बोलायचे झाल्यास अभिषेक शर्मा, रियान पराग, तुषार देशपांडे यांना श्रीलंकेचे तिकीट मिळणे मुश्किल आहे. खरंतर, २०२६टी-२० वर्ल्डकप लक्षात घेता श्रीलंकेविरुद् भारताच्या १५ सदस्यीय संघाची निवड केली जाऊ शकते. विश्वविजेता संघाचे सदस्य ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंह श्रीलंका मालिकेत खेळताना दिसू शकतात.



प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार हार्दिकच्या दौऱ्याची होऊ शकते सुरूवात


टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीर आता टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक आहेत. तर रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता हार्दिक पांड्या नवा टी-२० कर्णधार घोषित होऊ शकतो. ऋषभ पंतही कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे. खरंतर हार्दिक सतत दुखापतग्रस्त झाल्यास कर्णधार बनण्यामध्ये अडथळा येऊ शकतो.



श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ


शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(विकेटकीपर), संजू सॅमसन(विकेटकीपर), हार्दिक पांड्या(कर्णधार), रिंकु सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद/मुकेश कुमार.

Comments
Add Comment

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय

Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला

मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत

जेम्स नीशमच्या ‘त्या’ षटकामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला

संजू सॅमसन बनला क्रिकेट विश्वाचा नवा ‘फायनल बॉस’!

कोहली-सॅम्युअल्स-विल्यमसनचे रेकॉर्ड्स धुळीस अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक

अभिषेक शर्माने नॉकआउटमध्ये विक्रमी अर्धशतकासह रचला इतिहास

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक