IND vs SL: हार्दिक कर्णधार आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बाहेर, श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडिया

मुंबई: झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया(team india) श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेत भारतीय संघाला तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तितकेच वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार असू शकतो. तर जसप्रीत बुमराहला या मालिकेत आराम मिळू शकतो. याशिवाय शिवम दुबेही या मालिकेतून बाहेर होऊ शकतो.


झिम्बाब्वेविरुद्ध संघाबाबत बोलायचे झाल्यास अभिषेक शर्मा, रियान पराग, तुषार देशपांडे यांना श्रीलंकेचे तिकीट मिळणे मुश्किल आहे. खरंतर, २०२६टी-२० वर्ल्डकप लक्षात घेता श्रीलंकेविरुद् भारताच्या १५ सदस्यीय संघाची निवड केली जाऊ शकते. विश्वविजेता संघाचे सदस्य ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंह श्रीलंका मालिकेत खेळताना दिसू शकतात.



प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार हार्दिकच्या दौऱ्याची होऊ शकते सुरूवात


टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीर आता टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक आहेत. तर रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता हार्दिक पांड्या नवा टी-२० कर्णधार घोषित होऊ शकतो. ऋषभ पंतही कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे. खरंतर हार्दिक सतत दुखापतग्रस्त झाल्यास कर्णधार बनण्यामध्ये अडथळा येऊ शकतो.



श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ


शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(विकेटकीपर), संजू सॅमसन(विकेटकीपर), हार्दिक पांड्या(कर्णधार), रिंकु सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद/मुकेश कुमार.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण