IND vs SL: हार्दिक कर्णधार आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बाहेर, श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडिया

  56

मुंबई: झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया(team india) श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेत भारतीय संघाला तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तितकेच वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार असू शकतो. तर जसप्रीत बुमराहला या मालिकेत आराम मिळू शकतो. याशिवाय शिवम दुबेही या मालिकेतून बाहेर होऊ शकतो.


झिम्बाब्वेविरुद्ध संघाबाबत बोलायचे झाल्यास अभिषेक शर्मा, रियान पराग, तुषार देशपांडे यांना श्रीलंकेचे तिकीट मिळणे मुश्किल आहे. खरंतर, २०२६टी-२० वर्ल्डकप लक्षात घेता श्रीलंकेविरुद् भारताच्या १५ सदस्यीय संघाची निवड केली जाऊ शकते. विश्वविजेता संघाचे सदस्य ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंह श्रीलंका मालिकेत खेळताना दिसू शकतात.



प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार हार्दिकच्या दौऱ्याची होऊ शकते सुरूवात


टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीर आता टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक आहेत. तर रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता हार्दिक पांड्या नवा टी-२० कर्णधार घोषित होऊ शकतो. ऋषभ पंतही कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे. खरंतर हार्दिक सतत दुखापतग्रस्त झाल्यास कर्णधार बनण्यामध्ये अडथळा येऊ शकतो.



श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ


शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(विकेटकीपर), संजू सॅमसन(विकेटकीपर), हार्दिक पांड्या(कर्णधार), रिंकु सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद/मुकेश कुमार.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला