Jio, Airtel आणि Viचे सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान्स, मिळणार एक वर्षाची व्हॅलिडिटी

मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये बदल केले आहेत. या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी या महिन्याच्या सुरूवातीला आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमतीत २० ते २७ टक्के वाढ केली आहे. यानंतर ग्राहकांचा खर्च मात्र वाढला आहे.


जर तुम्ही या टेलिकॉम कंपन्यांची सर्व्हिस वापरता तर तुमचा महिन्याचा तसेच वर्षाचा रिचार्जचा खर्च आता वाढणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सने कॉलिंगपासून ते डेटा पर्यंतच्या प्लान्समध्ये बदल केले आहेत. जाणून घेऊया स्वस्त आणि महाग प्लानचे डिटेल्स...



जिओचा वार्षिक प्लान


जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक वार्षिक प्लान्स आहेत. दरम्यान, आपण सामान्य प्लानबद्दल बोलूया. कंपनी ३५९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात युजर्सला ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.


कंपनी एक स्वस्त पर्यायही देते. तुम्ही १८९९ रूपयांचा प्लान खरेदी करू शकता. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटीसाठी अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएसची सुविधा मिळते.



Airtelचा ३६५ दिवसांचा प्लान


एअरटेलमध्ये ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये फ्री हॅलो ट्यून, विंक म्युझिकची सुविधा मिळते.


कंपनी १९९९रूपयांचा वार्षिक प्लानही ऑफर करते. यात ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.



Viचा ३६५ दिवसांचा रिचार्ज


या पद्धतीने Viचा ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात युजर्सला ८५०जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय युजर्सला Binge All Night चाही अॅक्सेस मिळतो. जर तुम्ही स्वस्त प्लानच्या शोधात आहात तर कंपनी १९९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसोबत २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएस मिळतात. हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना केवळ कॉलिंग हवे आहे.

Comments
Add Comment

Political News: दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत

High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४

BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश मुंबई : 

Mumbai : गोरेगाव मुलुंड जोड मार्गाच्या जुळया बोगद्याच्या कामाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके