Ashadhi Wari : व्हीआयपी दर्शनाची घुसखोरी बंद! भाविकांना झटपट दर्शन देण्यासाठी प्रशासन सज्ज

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) विठुरायाच्या (Vitthal) दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी जमते. यंदाही आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसह लाखो भाविकांची पालखीजवळ गर्दी जमल्याचे दिसून येत आहे. यावेळी भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अशातच एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पुजेदरम्यानही गर्दी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. विठुरायाच्या महापूजेवेळी प्रशासनाने व्हीआयपी दर्शनाची घुसखोरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने मोठ्या प्रमाणात व्हीआयपी लोकांची हजेरी लागल्यास पुजेदरम्यान मोठ्या गर्दीला सामोरे जावे लागेल. यासाठी मंदिर समितीने पुजेकाळात व्हीआयपी पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र याकाळात मर्यादित व्हीआयपींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.



भाविकांना मिळणार मँगो ज्यूस


सध्या दर्शनासाठी १५ तास रांगेत उभे राहणारे भाविकांना आता केवळ ४ ते ५ तासात दर्शन मिळत आहे. याच पद्धतीने भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. त्याचबरोबर दर्शन रांगेतील भाविकांना शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले .

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा