किती असेल टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीरचा पगार? राहुल द्रविडपेक्षा कमी पैसे मिळणार की जास्त

  94

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला चॅम्पियन बनवणारे कोच राहुल द्रविड यांचा करार या स्पर्धेसोबत संपला होता. त्यांच्याकडून हे ही स्पष्ट करण्यात आले होते की आता त्यांना कार्यकाळ वाढवून घ्यायचा नाही आहे.


भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच गौतम गंभीर असतील अशी घोषणा मंगळवारी ९ जुलैला बीसीसीआयकडून करण्यात आली. आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न जरूर असेल की द्रविडची जागा घेणार्‍या धुरंधर क्रिकेटरचा पगार त्याच्यापेक्षा जास्त असेल का कमी?


मंगळवार भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी अधिकृतपणे गंभीरची नियुक्ती केल्याची घोषणा मंगळवारी केली. दरम्यान, गंभीरची निवड केली जाणार असे अनुमान आधीपासूनच लावले जात होते. दरम्यान, गंभीरचा पगार अजून ठरणे बाकी आहे. मात्र माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांच्याइतकाच त्यांचा पगार असण्याची शक्यता आहे.


भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बीसीसीआयकडून वार्षिक १२ कोटी रूपये पगार दिला जात होता. गंभीरचाही पगार तितकाच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमसाठी जबाबदारी सांभाळणे अधिक महत्त्वाचे होते. पगार आणि इतर गोष्टींवर काम केले जाऊ शकते. २०१४मध्ये रवी शास्त्री यांनी पदभार सांभाळला होता तेव्हा त्यांचा करार करण्यात आला नव्हता. नंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गौतमच्या बाबतीतही काही बारीक बाबींवर काम केले जात आहे. त्याचा पगार राहुल द्रविड यांच्याइतकाच असेल.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला