Vastu Tips: महिलांनी कोणत्या दिशेला पाय करून झोपणे चांगले, घ्या जाणून

मुंबई: वास्तुमध्ये दिशेला मोठे महत्त्व आहे. वास्तुमध्ये सांगण्यात आलेल्या ८ दिशा आपल्या जीवनाची दशा बदलू शकतात. याच कारणामुळे आपल्या घराच्या निर्मितीमध्ये पूजेचे घर, किचन तसेच इतर अनेक बाबींबद्दल महत्त्वाचे सांगण्यात आले आहे.


वास्तुनुसार महिलांना कोणत्या दिशेला पाय करून झोपले हे ही सांगण्यात आले आहे. याचे पालन करणाऱ्यांना करिअरमध्ये अडथळे येत नाहीत. तसेच सुख-समृद्धी धनाची कमतरता राहत नाही. आरोग्यही चांगले राहते. झोपताना कोणत्या दिशेला तोंड आणि कोणत्या दिशेला पाय करायला हवेत हे जाणून घ्या...



महिलांनी कोणत्या दिशेला पाय करून झोपले पाहिजे?


उत्तर-दक्षिण - महिलांना घरची लक्ष्मी म्हटले जाते. वास्तुमध्ये सांगितल्यानुसार झोपताना स्त्रियांचे पाय उत्तर दिशेला तर डोके दक्षिण दिशेला असले पाहिजे. यामुळे जीवन सुखमय होते. घरात लक्ष्मीचा वास राहतो. नेहमी भरभराट होते. घरात सुख-समृद्धीची कमतरता येत नाही.


पूर्व-पश्चिम - तर उत्तर-दक्षिण बेड ठेवू शकत नसाल तर पूर्व दिशेला डोके आणि पश्चिम दिशेला पाय करून झोपले पाहिजे. पूर्व दिशेला सूर्योदय होतो. यामुळे जीवनात सकारात्मकता राहते. ज्ञान वाढते. आरोग्याचे फायदे मिळतात.



कोणत्या दिशेला झोपले नाही पाहिजे


कधीही पूर्व अथवा दक्षिण दिशेला पाय करून झोपले नाही पाहिजे. जर तुम्ही असे करत आहात तर तुम्हाला आरोग्यासंबंधी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच नकारात्मक विचार मनात घर करू लागतात. मंगळ दोष उत्पन्न होऊ शकतो.



काय आहे झोपण्याची योग्य वेळ?


शास्त्रानुसार व्यक्तीला सूर्योदयाच्या आधी उठले पाहिजे. सूर्योदय झाल्यानंतर उशिरापर्यंत झोपू नये. यामुळे केवळ आरोग्यावरच परिणाम होत नाही धन वृद्धीही थांबते. संध्याकाळच्या वेळेस झोपणे शुभ मानले जाते.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड