Vastu Tips: महिलांनी कोणत्या दिशेला पाय करून झोपणे चांगले, घ्या जाणून

  116

मुंबई: वास्तुमध्ये दिशेला मोठे महत्त्व आहे. वास्तुमध्ये सांगण्यात आलेल्या ८ दिशा आपल्या जीवनाची दशा बदलू शकतात. याच कारणामुळे आपल्या घराच्या निर्मितीमध्ये पूजेचे घर, किचन तसेच इतर अनेक बाबींबद्दल महत्त्वाचे सांगण्यात आले आहे.


वास्तुनुसार महिलांना कोणत्या दिशेला पाय करून झोपले हे ही सांगण्यात आले आहे. याचे पालन करणाऱ्यांना करिअरमध्ये अडथळे येत नाहीत. तसेच सुख-समृद्धी धनाची कमतरता राहत नाही. आरोग्यही चांगले राहते. झोपताना कोणत्या दिशेला तोंड आणि कोणत्या दिशेला पाय करायला हवेत हे जाणून घ्या...



महिलांनी कोणत्या दिशेला पाय करून झोपले पाहिजे?


उत्तर-दक्षिण - महिलांना घरची लक्ष्मी म्हटले जाते. वास्तुमध्ये सांगितल्यानुसार झोपताना स्त्रियांचे पाय उत्तर दिशेला तर डोके दक्षिण दिशेला असले पाहिजे. यामुळे जीवन सुखमय होते. घरात लक्ष्मीचा वास राहतो. नेहमी भरभराट होते. घरात सुख-समृद्धीची कमतरता येत नाही.


पूर्व-पश्चिम - तर उत्तर-दक्षिण बेड ठेवू शकत नसाल तर पूर्व दिशेला डोके आणि पश्चिम दिशेला पाय करून झोपले पाहिजे. पूर्व दिशेला सूर्योदय होतो. यामुळे जीवनात सकारात्मकता राहते. ज्ञान वाढते. आरोग्याचे फायदे मिळतात.



कोणत्या दिशेला झोपले नाही पाहिजे


कधीही पूर्व अथवा दक्षिण दिशेला पाय करून झोपले नाही पाहिजे. जर तुम्ही असे करत आहात तर तुम्हाला आरोग्यासंबंधी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच नकारात्मक विचार मनात घर करू लागतात. मंगळ दोष उत्पन्न होऊ शकतो.



काय आहे झोपण्याची योग्य वेळ?


शास्त्रानुसार व्यक्तीला सूर्योदयाच्या आधी उठले पाहिजे. सूर्योदय झाल्यानंतर उशिरापर्यंत झोपू नये. यामुळे केवळ आरोग्यावरच परिणाम होत नाही धन वृद्धीही थांबते. संध्याकाळच्या वेळेस झोपणे शुभ मानले जाते.

Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड