Mental Health: या गोष्टींमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो परिणाम

  70

मुंबई: मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे. मुलांच्या मानसिक स्थितीवर आजूबाजूच्या परिस्थितीचाही परिणाम होतो. अभ्यासाचे प्रेशर, मित्रांचा दबाव आणि घरातील वातावरणामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. जर योग्य वेळेस लक्ष दिले नाही अथवा पावले उचलली नाहीत तर मुलांचे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते.



अभ्यासाचा दबाव


मुलांवर अभ्यासाचा दबाव मोठा असते. आई-वडिलांच्या अपेक्षा, शाळेच्या मागण्या आणि समाजाचा दबाव यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यापासून बचावासाठी मुलांवर अभ्यासाचा दबाव टाकू नका. त्यांच्या क्षमता समजून घ्या आणि वेळोवेळी त्यांना आराम द्या. अभ्यासासोबत खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटीसाठीही वेळ द्या.



कुटुंबातील वातावरण


कुटुंबातील वातावरणाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. जर घरात सतत वाद तसेच तणाव असेल तर याचा परिणाम मुलांवर होतो. यामुळे घरात शांतता आणि प्रेम असावे. मुलांच्यासमोर वाद घालू नका. कुटुंबाने एकत्र वेळ घालवावा. तसेच मुलांनाही आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी द्या. यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहील आणि ते खुश राहतील.



सोशल मीडियाचा प्रभाव


मुलांवर मित्र आणि समाजाचा दबाव असतो. सोशल मीडियावर हा दबाव आणखी वाढतो. हा कमी करण्यासाठी मुलांशी खुलेपणाने बोला आणि त्यांच्या समस्या समजून घ्या. दुसऱ्या मुलांशी सतत तुलना करू नका. ते जसे आहेत तसे स्वीकारा.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी