Mental Health: या गोष्टींमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो परिणाम

मुंबई: मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे. मुलांच्या मानसिक स्थितीवर आजूबाजूच्या परिस्थितीचाही परिणाम होतो. अभ्यासाचे प्रेशर, मित्रांचा दबाव आणि घरातील वातावरणामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. जर योग्य वेळेस लक्ष दिले नाही अथवा पावले उचलली नाहीत तर मुलांचे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते.



अभ्यासाचा दबाव


मुलांवर अभ्यासाचा दबाव मोठा असते. आई-वडिलांच्या अपेक्षा, शाळेच्या मागण्या आणि समाजाचा दबाव यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यापासून बचावासाठी मुलांवर अभ्यासाचा दबाव टाकू नका. त्यांच्या क्षमता समजून घ्या आणि वेळोवेळी त्यांना आराम द्या. अभ्यासासोबत खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटीसाठीही वेळ द्या.



कुटुंबातील वातावरण


कुटुंबातील वातावरणाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. जर घरात सतत वाद तसेच तणाव असेल तर याचा परिणाम मुलांवर होतो. यामुळे घरात शांतता आणि प्रेम असावे. मुलांच्यासमोर वाद घालू नका. कुटुंबाने एकत्र वेळ घालवावा. तसेच मुलांनाही आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी द्या. यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहील आणि ते खुश राहतील.



सोशल मीडियाचा प्रभाव


मुलांवर मित्र आणि समाजाचा दबाव असतो. सोशल मीडियावर हा दबाव आणखी वाढतो. हा कमी करण्यासाठी मुलांशी खुलेपणाने बोला आणि त्यांच्या समस्या समजून घ्या. दुसऱ्या मुलांशी सतत तुलना करू नका. ते जसे आहेत तसे स्वीकारा.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका