Rikshaw-Taxi Travel : आता मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवासही महागणार!

मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Govt.) सीएनजीच्या (CNG Price Hike) दरांमध्ये प्रतिकिलोमागे १.५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर घरगुती पाईपलाईन गॅसची देखील दरवाढ जाहीर करण्यात आली. यासह पावसाच्या अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या (Vegetables) दरातही मोठी वाढ झाली होती. दूध, भाज्या, फळे, तेल अशा गरजेपयोगी लागणाऱ्या गोष्टींच्या सातत्याने वाढत चाललेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडत आहे. वाढत्या महागाईत आता मुंबईकरांचा प्रवास (Expensive Travel) देखील महागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर रिक्षा संघटनेनंही भाडेवाढ करण्याची मागणी उचलून धरली आहे. रिक्षा चालकांनी प्राथमिक दर २३ रुपयांवरून २५ रुपयांवर तर प्रति किमी रनिंग भाडे १५.३३ रुपयांवरून १६.९९ रुपये केले जाण्याची मागणी केली आहे. (Rikshaw-Taxi Travel Price Hike)



दोन वर्षाआधी केलेली दरवाढ


ऑक्टोबर २०२२ रोजी रिक्षाच्या दरात २१ रूपयांवरून २३ रूपये तर, टॅक्सीच्या दरात २५ रुपयांवरून २८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरवाढ होऊन आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यातच आता सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांनी सांगितले.


दरम्यान, रिक्षा भाडेवाढीच्या मागोमाग आता टॅक्सी युनियनही दरवाढीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय येत्या काळात घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

Borivali : बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नोस्टीक सेंटर खासगी संस्थेकडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय

Mumbai : मौलाना शौकत अली मार्गावरील अनधिकृत फर्निचर विक्रेत्यांवर कारवाई, चालवला बुलडोझर

मुंबई(विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभाग अंतर्गत मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर

'स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या'

मुंबई : राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र

Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने

Nitesh Rane : मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या, मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या

Pandharpur : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी