IND vs ZIM : भारताचा झिम्बाब्वेवर दमदार विजय, मालिकेत २-१ने आघाडीवर

हरारे: भारत(india) आणि झिम्बाब्वे(zimbawbe) यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात झिम्बाब्वेला धावांनी हरवत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.


कर्णधार शुभमन गिलची अर्धशतकी खेळी तसेच ऋतुराज गायकवाडच्या जबरदस्त ४९ खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवण्यात यश मिळवले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या होत्या.


भारताची सुरूवात दमदार झाली होती. यशस्वी जायसवाल आणि गिल यांनी जबरदस्त सलामी करताना ६७ धावा ठोकल्या. त्यानंतर यशस्वी ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर गिलसोबत अभिषेक शर्मा खेळत होता. दुसऱ्या सामन्यात तडाखेबंद खेळी करणाऱ्या अभिषेकला या सामन्यात मात्र १० धावाच करता आल्या.


त्यानंतर ऋतुराज आणि गिलने एकत्र खेळण्यास सुरूवात केली आणि भारताचा डाव १८२ धावांवर नेऊन पोहोचवण्यास मदत केली.ind


झिम्बाब्वे विजयासाठी १८३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली. मात्र सुरूवातीपासून भारताच्या गोलंदाजांनी दबाव टाकण्यास सुरूवात केली होती. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त कामगिरी करताना ३ विकेट घेतल्या. तर आवेश खानने दोन बळी घेतले. यामुळे झिम्बाब्वेला २० षटकांत केवळ १५९ धावाच करता आल्या.यासोबतच भारताने या सामन्यात २३ धावांनी विजय मिळवला.


या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त कमबॅक करताना सामना जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त विजय मिळवत ही आघाडी वाढवली आहे.


Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात