IND vs ZIM : भारताचा झिम्बाब्वेवर दमदार विजय, मालिकेत २-१ने आघाडीवर

हरारे: भारत(india) आणि झिम्बाब्वे(zimbawbe) यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात झिम्बाब्वेला धावांनी हरवत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.


कर्णधार शुभमन गिलची अर्धशतकी खेळी तसेच ऋतुराज गायकवाडच्या जबरदस्त ४९ खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवण्यात यश मिळवले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या होत्या.


भारताची सुरूवात दमदार झाली होती. यशस्वी जायसवाल आणि गिल यांनी जबरदस्त सलामी करताना ६७ धावा ठोकल्या. त्यानंतर यशस्वी ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर गिलसोबत अभिषेक शर्मा खेळत होता. दुसऱ्या सामन्यात तडाखेबंद खेळी करणाऱ्या अभिषेकला या सामन्यात मात्र १० धावाच करता आल्या.


त्यानंतर ऋतुराज आणि गिलने एकत्र खेळण्यास सुरूवात केली आणि भारताचा डाव १८२ धावांवर नेऊन पोहोचवण्यास मदत केली.ind


झिम्बाब्वे विजयासाठी १८३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली. मात्र सुरूवातीपासून भारताच्या गोलंदाजांनी दबाव टाकण्यास सुरूवात केली होती. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त कामगिरी करताना ३ विकेट घेतल्या. तर आवेश खानने दोन बळी घेतले. यामुळे झिम्बाब्वेला २० षटकांत केवळ १५९ धावाच करता आल्या.यासोबतच भारताने या सामन्यात २३ धावांनी विजय मिळवला.


या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त कमबॅक करताना सामना जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त विजय मिळवत ही आघाडी वाढवली आहे.


Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे