IND vs ZIM : भारताचा झिम्बाब्वेवर दमदार विजय, मालिकेत २-१ने आघाडीवर

हरारे: भारत(india) आणि झिम्बाब्वे(zimbawbe) यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात झिम्बाब्वेला धावांनी हरवत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.


कर्णधार शुभमन गिलची अर्धशतकी खेळी तसेच ऋतुराज गायकवाडच्या जबरदस्त ४९ खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवण्यात यश मिळवले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या होत्या.


भारताची सुरूवात दमदार झाली होती. यशस्वी जायसवाल आणि गिल यांनी जबरदस्त सलामी करताना ६७ धावा ठोकल्या. त्यानंतर यशस्वी ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर गिलसोबत अभिषेक शर्मा खेळत होता. दुसऱ्या सामन्यात तडाखेबंद खेळी करणाऱ्या अभिषेकला या सामन्यात मात्र १० धावाच करता आल्या.


त्यानंतर ऋतुराज आणि गिलने एकत्र खेळण्यास सुरूवात केली आणि भारताचा डाव १८२ धावांवर नेऊन पोहोचवण्यास मदत केली.ind


झिम्बाब्वे विजयासाठी १८३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली. मात्र सुरूवातीपासून भारताच्या गोलंदाजांनी दबाव टाकण्यास सुरूवात केली होती. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त कामगिरी करताना ३ विकेट घेतल्या. तर आवेश खानने दोन बळी घेतले. यामुळे झिम्बाब्वेला २० षटकांत केवळ १५९ धावाच करता आल्या.यासोबतच भारताने या सामन्यात २३ धावांनी विजय मिळवला.


या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त कमबॅक करताना सामना जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त विजय मिळवत ही आघाडी वाढवली आहे.


Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून