Eknath Shinde : मुंबईतील 'या' पब, बारवर कठोर कारवाई करा!

मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश


मुंबई : दोन दिवसांपूर्वी वरळीतील हिट अँड रन (Worli Accident) प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यानंतर (Pune) मुंबईतील हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणावरुन राज्यातील जनतेचा दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पोलिसांनी पुणे शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व पब व बारवर कठोर कारवाई केली होती. त्यानंतर आता मुंबईतील अपघाताचे वाढते सत्र रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला नियमभंग करणाऱ्या पबवर कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.


लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर मद्यधुंद असताना वाहने चालविणाऱ्याचा परवाना रद्द करण्यात यावा. तसेच रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यांसह नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.



मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश



  • रात्रीच्या वेळेस गाड्या तपासण्यांचे प्रमाण वाढवावे.

  • मद्यसेवन करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी.

  • नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना रद्द करण्यात यावा.

  • मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करावी.

  • पब, बार, उपाहारगृहे चालू ठेवण्याची वेळ, ध्वनिप्रदुषणाचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या कराव्या.

  • रात्री उशिरा सुरू राहणारे बार, पब, उपाहारगृहांवर कारवाई करावी. पालिका व पोलिसांनी त्यांचे परवाने रद्द करावे.

  • मद्यासेवन करून वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी.

Comments
Add Comment

BEST ACCIDENT : मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा थरार, कांदिवलीत दोघांना चिरडले; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

MUMBAI : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. दादर येथील बस

Fire Station : चांदिवलीमध्ये अग्निशमन दलाची होणार उभारणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) चांदिवली (Chandiwali)  येथे नव्याने अग्निशमन केंद्र (Fire station) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या

BMC News : सखल भागांमध्ये अश्वशक्तीने महापालिका करणार प्रयत्न, साचलेले पाणी उचलून फेकणार

- मुंबईतील आठ ठिकाणी पुढील तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर पंपाची सुविधा - तब्बल १२३ कोटी रुपये करणार खर्च मुंबई (सचिन

BMC News : रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल १४ कंत्राटदारांची निवड, यंदा केवळ ४२ कोटींचीच कामे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे

Tree Plantation on Coastal Road : विस्तारीत कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात १७७८ झाडे बाधित, बदल्यात लावणार सुमारे १६ हजार झाडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई किनारी रस्ते प्रकल्प (उत्तर) वर्सोवा आंतरबदल ते दहिसर भाईंदर मार्गावरील दहिसर

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नव्या आरक्षण प्रणालीमुळे तिकीट बुकिंग होणार अधिक सोपं

मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांसाठी एक मोठं तांत्रिक अपग्रेड (Technological Upgrade) घेऊन येत आहे. तब्बल ४० वर्षांपासून