Bank Job : 'या' बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी!

मिळणार भरघोस पगार; 'असा' करा अर्ज


मुंबई : सरकारी बँकेत (Government Job) नोकरी करण्याची अनेकांची इच्छा (Bank Job)असते. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) काही रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. एसबीआयने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज प्रकिया देखील सुरु करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईनरित्या अर्ज भरावा लागणार आहे. जाणून घ्या अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, अर्ज फी, वेतन, शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती.


स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी चार रिक्त जागांसाठी भरती जारी केली आहे. २४ ते ४० वर्ष वयोगटातील उमेदवार भरतीसाठी अर्ज करु शकणार आहेत. ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना sbi.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावा लागणार आहे.



शैक्षणिक पात्रता


डेप्युटी मॅनेजर पदासाठी उमेदवाराने एमबीए, पीजीडीएम पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे आणि गुणवत्ता यादीवर केली जाणार आहे.



वेतन


निवड झालेल्या उमेदवारांना ६४,८२० रुपये ते ९३,९६० रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.



अर्ज शुल्क


या नोकरीसाठी सामान्य, ओबीसी/EWS उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWBD प्रवर्गातील लोकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. तर या नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२४ आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही