ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा


मुंबई : मुंबईत काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai heavy rainfall) मुंबईचे चांगलेच हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे तर रेल्वेसेवाही (Mumbai Railway) ठप्प झाली आहे. काही रेल्वे जागच्या जागी थांबल्या, त्यामुळे प्रवासी थेट पटरीवर उतरले आणि चालत निघाले. हार्बर रेल्वेसेवा (Harbour railway) देखील बंद झाली आहे. यामुळे या मार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसची (ST Bus) सुविधा उपलब्ध असणार आहे. नेमक्या या बसेस कुठून व कधी सुटणार हे जाणून घ्या.


आज ८ जुलै रोजी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद असल्याने तेथे अडकलेल्या प्रवाशांसाठी या बसेस असणार आहेत-
१) पनवेल ते दादर मार्गावर ९.००, ९.०५, १०.१५, १०.३०, १०.४०
२) पनवेल ते वाशी १०.२०
३) उरण ते दादर ५.३०, ६.३०, ७.००, ७.३०, ८.१५, ८.४५, ९.१०, ९.३०, १०.३०

त्याचप्रमाणे मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने येथील प्रवाशांच्या सोयीसाठी भिवंडी, ठाणे, त्र्यंबकेश्वर, सातारा, कराड या बसेस तसेच श्रीवर्धन रायगड, चिपळूण, शिवथर रत्नागिरी बसेस छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानका (सीएसएमटी) वरुन सोडण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.


Comments
Add Comment

BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज https://prahaar.in/2026/08/06/residents-of-worli-prabhadevi-and-lower-parel-will-face-garbage-related-issues-for-3-to-4-days/ मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर