रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

  47

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे. या धुरंधरने टीम इंडियाला गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे स्वप्न मोडले होते.


दरम्यान, टी-२० वर्ल्डकपमध्ये मात्र रोहितने ही चूक केली नाही. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला मात देत वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब मिळवला. पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधाराने सोशल अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो सोमवारी बदलला. हा फोटो बदलल्यानंतर त्याच्या लाईक्सची संख्या मिलियन्सवर पोहोचली आहे.


आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कर्णधार रोहित शर्माने सोमवारी आपल्या सोशल अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलला. त्याने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा फोटो बदलला. त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या अविस्मरणीय विजयानंतर बार्बाडोसच्या मैदानावर भारताचा तिरंगा फडकावला होता. रोहित शर्माने तिरंगा जमिनीत रोवला आणि हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.


 


रोहितच्या प्रोफाईल फोटोला मिलियन लाईक्स


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोमवारी ८ जुलैला संध्याकाळी आपला प्रोफाईल फोटो बदलला आणि पाहता पाहता लाईक्सची संख्या मिलियन्सवर पोहोचली. केवळ ३ तासांच्या आत या फोटोला तब्बल १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र