रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे. या धुरंधरने टीम इंडियाला गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे स्वप्न मोडले होते.


दरम्यान, टी-२० वर्ल्डकपमध्ये मात्र रोहितने ही चूक केली नाही. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला मात देत वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब मिळवला. पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधाराने सोशल अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो सोमवारी बदलला. हा फोटो बदलल्यानंतर त्याच्या लाईक्सची संख्या मिलियन्सवर पोहोचली आहे.


आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कर्णधार रोहित शर्माने सोमवारी आपल्या सोशल अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलला. त्याने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा फोटो बदलला. त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या अविस्मरणीय विजयानंतर बार्बाडोसच्या मैदानावर भारताचा तिरंगा फडकावला होता. रोहित शर्माने तिरंगा जमिनीत रोवला आणि हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.


 


रोहितच्या प्रोफाईल फोटोला मिलियन लाईक्स


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोमवारी ८ जुलैला संध्याकाळी आपला प्रोफाईल फोटो बदलला आणि पाहता पाहता लाईक्सची संख्या मिलियन्सवर पोहोचली. केवळ ३ तासांच्या आत या फोटोला तब्बल १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण