मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर सपोर्ट स्टाफने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या दरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंशी चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी क्रिकेटमधील त्यांच्या यशाबद्दल इतर स्पोर्ट्समधील यशाबद्दल चर्चा केली. याशिवाय पंतप्रधान मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ बद्दलही चर्चा केली. या ऑलिम्पिकचे आयोजन लॉस एंजेलिसला होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या आशांबद्दल सवाल केले तर राहुल द्रविडने म्हटले की ऑलिम्पिकमध्ये खेळणे क्रिकेटर्ससाठी मोठी गोष्ट असेल. सोबतच देश आणि मंडळासाठी मोठे यश असेल. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असणे ही गर्वाची गोष्ट आहे. माझी आशा आहे या संघाचे अनेक खेळाडू ऑलिम्पिक २०२८चा भाग असतील. अनेक तरूण खेळआडू असतील मात्र आमच्या नजरा सुवर्णपदक जिंकण्यावर असेल. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपासून क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. गेल्या १०० वर्षांपासून क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग नाही आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…