मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी जमलेल्या लाखो क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीमुळे अनेक चाहत्यांची तब्येत बिघडली. तर काही जखमी झाले. काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० लोकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सूत्रांनी हे ही सांगितले की आठ लोकांवर उपचार करून तातडीने डिस्चार्ज देण्यात आला तर दोघांना उपचारासाठी अॅडमिट करून घेण्यात आले.
बार्बाडोसच्या जमिनीवर दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनलमध्ये हरवत रोहित ब्रिगेडने तिरंगा फडकवला होता. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर या क्रिकेट चाहत्यांनी अतिशय धामधुमीत भारतीय क्रिकेटर्सचे स्वागत केले. प्रत्येकजण आपल्या हातात झेंडा घेऊन चॅम्पियन्सची एक झलक पाहण्यासाठी मैदानात उतरला होता.
२९ जून २०२४ या दिवशी टीम इंडियाने केवळ एक सामना, स्पर्धा अथवा ट्रॉफी जिंकली नव्हती तर कोट्यावधी भारतीयांचा ११ वर्षांचा दीर्घ प्रतीक्षा काळ संपवला होता.
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…