टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी जमलेल्या लाखो क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीमुळे अनेक चाहत्यांची तब्येत बिघडली. तर काही जखमी झाले. काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.


पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० लोकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सूत्रांनी हे ही सांगितले की आठ लोकांवर उपचार करून तातडीने डिस्चार्ज देण्यात आला तर दोघांना उपचारासाठी अॅडमिट करून घेण्यात आले.



विजयी मिरवणुकीत चाहत्यांचा उत्साह शिगेला


बार्बाडोसच्या जमिनीवर दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनलमध्ये हरवत रोहित ब्रिगेडने तिरंगा फडकवला होता. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर या क्रिकेट चाहत्यांनी अतिशय धामधुमीत भारतीय क्रिकेटर्सचे स्वागत केले. प्रत्येकजण आपल्या हातात झेंडा घेऊन चॅम्पियन्सची एक झलक पाहण्यासाठी मैदानात उतरला होता.


२९ जून २०२४ या दिवशी टीम इंडियाने केवळ एक सामना, स्पर्धा अथवा ट्रॉफी जिंकली नव्हती तर कोट्यावधी भारतीयांचा ११ वर्षांचा दीर्घ प्रतीक्षा काळ संपवला होता.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना