टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी जमलेल्या लाखो क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीमुळे अनेक चाहत्यांची तब्येत बिघडली. तर काही जखमी झाले. काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.


पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० लोकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सूत्रांनी हे ही सांगितले की आठ लोकांवर उपचार करून तातडीने डिस्चार्ज देण्यात आला तर दोघांना उपचारासाठी अॅडमिट करून घेण्यात आले.



विजयी मिरवणुकीत चाहत्यांचा उत्साह शिगेला


बार्बाडोसच्या जमिनीवर दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनलमध्ये हरवत रोहित ब्रिगेडने तिरंगा फडकवला होता. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर या क्रिकेट चाहत्यांनी अतिशय धामधुमीत भारतीय क्रिकेटर्सचे स्वागत केले. प्रत्येकजण आपल्या हातात झेंडा घेऊन चॅम्पियन्सची एक झलक पाहण्यासाठी मैदानात उतरला होता.


२९ जून २०२४ या दिवशी टीम इंडियाने केवळ एक सामना, स्पर्धा अथवा ट्रॉफी जिंकली नव्हती तर कोट्यावधी भारतीयांचा ११ वर्षांचा दीर्घ प्रतीक्षा काळ संपवला होता.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)