मुंबई : ‘देशामध्ये केंद्रात राहुल गांधी (Rahul Gandhi) नावाचा एक बालबुद्धी आहे आणि दुसरा आमच्या महाराष्ट्रात भांडुपमध्ये बसलेला एक बालबुद्धी आहे. नेमकी कोणाची बुद्धी लहान आहे याबाबत यांची आपसांतच स्पर्धा लागली आहे’, असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला. तसेच काल भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीसाठी गुजरातची गाडी वापरल्याबद्दल रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या टीकेवर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नाव न घेता जोरदार टीका केली.
नितेश राणे म्हणाले, काल झालेल्या क्रिकेट संघाच्या स्वागताच्या निमित्ताने जी बस वापरली गेली ती गुजरातच्या नंबर प्लेटची होती. त्यामुळे लगेच गुजरातच्या नावाने मिरच्या झोंबल्या. अन्य वेळी बोटं चाटून चाटून ढोकळे खायचे. यांच्या मालकाने अंबानींच्या लग्नामध्ये नाचून दाखवायचं आणि मग सकाळी उठून यांचा कामगार गुजरात्यांच्या नावाने खडी फोडणार. या भांडुपच्या बालबुद्धीला हे कळत नाही की आपल्या बेस्टकडे ज्या ओपन बसेस आहेत त्या खराब झालेल्या होत्या. त्या अवस्थेत नव्हत्या की त्या कालच्या पूर्ण मिरवणुकीत आपल्या खेळाडूंना घेऊन जाऊ शकतील. म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोशिअनने तो निर्णय घेतला. त्यात एवढा बागुलबुवा करण्याची काहीच गरज नाही, कारण अन्य वेळी संजय राऊतचा मालक गुजराती समाजाशिवाय काहीच करत नाही.
पुढे ते म्हणाले, सकाळी हा बोंबाबोंब करतो आणि संध्याकाळी अंबानीच्या घरच्या लग्नासाठी हे लोक नाचायला बसतात, अदानींच्या बाबत काँग्रेसवाले सभागृहात बोंब मारतात आणि मग त्यांचेच नेते अदानींच्या प्रायव्हेट फ्लाईटमधून देशभरात प्रवास करतात. विजय वडेट्टीवारांना काल मला आठवण करुन द्यायची होती की अदानींबाबत बोलण्याअगोदर अदानींचा खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्याबरोबर आहे. जो मुंबईत आल्यानंतर अदानींची गाडी चालवतो. तोच ड्रायव्हर काल मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता. मग संध्याकाळी वानखेडेमध्ये रोहित शर्मासोबत फोटो काढण्यासाठी त्याच्यामागे पोट धरुन पळत होता. मग हा जो काही डबलढोलकीपणा आहे हा महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिली आहे, असं नितेश राणे म्हणाले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…