१९८३चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या खेळाडूंना किती पैसे मिळाले होते? ऐकून वाटेल आश्चर्य

मुंबई: टीम इंडिया(team india) टी-२० वर्ल्डकपची चॅम्पियन ठरली आहे. फायनल सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत खिताब आपल्या नावे केला. चमचमणाऱ्या ट्रॉफीसह टीम इंडियाला २०.३६ कोटी रूपयांचे बक्षीसही मिळाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला १२५ कोटी रूपये देण्याची घोषणा केली.


भारतीय संघ मायदेशात परतल्यानंतर त्यांचे चॅम्पियनप्रमाणे स्वागत झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रिकेटर्सची भेट घेतली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो होता १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा. तेव्हा भारताने कपिल देवच्या नेतृत्वात लॉर्ड्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजला हरवत क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता.


मायदेशात परतल्यानंतर या भारतीय संघाची केवळ पंतप्रधान इंदिरा गांधीच यांनी भेट घेतली नाही तर त्यावेळचे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग हे ही खेळाडूंना भेटले. मात्र तुम्हाला माहीत आहे का की त्यावेळेस भारतीय संघाला किती पैसे मिळाले होते. बीसीसीआय आज जितकी श्रीमंत संस्था आहे तेवढी त्यावेळेस नव्हती. तेव्हा बोर्डाकडे इतका पैसा नव्हता.


कपिल देवच्या नेतृत्वात टीम इंडिया जेव्हा वर्ल्डकप जिंकून परतली तेव्हा बीसीसीआयच्या हातात काही नव्हते मात्र खेळाडूंना काहीतरी द्यायचे मात्र होते. तेव्हा एनकेपी साळवे बीससीआयचे अध्यक्ष होते. ते लता मंगेशकर यांच्याकडे गेले आणि दिल्लीत एक कॉन्सर्ट घेण्याची विनंती केली. यामुळे खेळाडूंसाठी पैसा जमा करता येईल. लता मंगेशकर यांनी लगेचच हो म्हटले.


दिल्लीत लता मंगेशकर यांची कॉन्सर्ट सुपरहिट ठरली. या कॉन्सर्टच्या माध्यमातून २० लाख रूपये जमा झाले आणि बीसीसीआयने क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक लाख रूपये दिले. विशेष म्हणजे या कॉन्सर्टसाठी लता मंगेशकर यांनी एक रूपयाही घेतला नव्हता.

Comments
Add Comment

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या