Hair Tips: पावसात केस भिजल्यास लगेच करा हे काम, नाहीतर होईल त्रास

मुंबई: पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. या मोसमात प्रत्येकाला आपले आरोग्य, त्वचा तसेच केसांची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही याची काळजी घेतली नाही तर यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.



पावसाळ्यामध्ये केस गळती


पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच केसगळती आणि त्वचेशी संबंधित समस्या होऊ लागतात. जर तुम्ही या मोसमात भिजत असाल तर भिजल्यानंतर तुमच्या केसांची योग्य ती काळजी घ्या. जर तुम्ही नीट काळजी घेतली नाही तर केस गळू लागतील आणि खराबही होऊ शकतात.



पावसाच्या दिवसांत अशी घ्या काळजी


जाणून घेऊया पावसाच्या दिवसांत आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी. जेव्हा पावसाने तुमचे केस भिजतील तेव्हा घरी येऊन आपले केस शँपूने चांगले धुवा आणि सुकवा. जेव्हा तुम्ही शँपू कराल तेव्हा बोटांच्या मदतीने हलक्या हातांनी स्काल्पला मसाज करा. यामुळे केसांमध्ये जमलेली घाण स्वच्छ होईल.



कंडिशनरचा करा वापर


पावसाच्या दिवशी शँपू केल्यानंतर हेअर कंडिशनरचा वापर जरूर करा. यामुळे रूक्ष आणि निस्तेज झालेले केस सिल्की आणि सॉफ्ट दिसतील. आठवड्यातून एकदा अथवा दोनवेळा हेअर कंडिशनरचा जरूर वापर करा.



कोमट पाण्याचा वापर


जर तुम्ही पावसामुळे भिजलात आणि घरी येऊन केस धुवत असाल तर कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पावसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळते.



नारळाच्या तेलाचा वापर


केस चांगले सुकल्यानंतर केस विंचरून घ्या. तसेच केसांना नारळाचे तेल जरूर लावा. नारळाच्या तेलात थोडासा लिंबूचा रस पिळून ते केसांच्या मुळाशी लावून मसाज केल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.


पावसाच्या दिवसांत आठवड्यातून एकदा अथवा दोन वेळा कोमट पाण्याने मसाज केले पाहिजे. यामुळे केस चांगले राहतील. लक्षात ठेवा की पावसाच्या दिवसांत केस ओले राहता कामा नये नाहीतर केसांना वास येतो. तसेच केस मोठ्या प्रमाणात गळतात.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण