मुंबई: पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. या मोसमात प्रत्येकाला आपले आरोग्य, त्वचा तसेच केसांची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही याची काळजी घेतली नाही तर यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच केसगळती आणि त्वचेशी संबंधित समस्या होऊ लागतात. जर तुम्ही या मोसमात भिजत असाल तर भिजल्यानंतर तुमच्या केसांची योग्य ती काळजी घ्या. जर तुम्ही नीट काळजी घेतली नाही तर केस गळू लागतील आणि खराबही होऊ शकतात.
जाणून घेऊया पावसाच्या दिवसांत आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी. जेव्हा पावसाने तुमचे केस भिजतील तेव्हा घरी येऊन आपले केस शँपूने चांगले धुवा आणि सुकवा. जेव्हा तुम्ही शँपू कराल तेव्हा बोटांच्या मदतीने हलक्या हातांनी स्काल्पला मसाज करा. यामुळे केसांमध्ये जमलेली घाण स्वच्छ होईल.
पावसाच्या दिवशी शँपू केल्यानंतर हेअर कंडिशनरचा वापर जरूर करा. यामुळे रूक्ष आणि निस्तेज झालेले केस सिल्की आणि सॉफ्ट दिसतील. आठवड्यातून एकदा अथवा दोनवेळा हेअर कंडिशनरचा जरूर वापर करा.
जर तुम्ही पावसामुळे भिजलात आणि घरी येऊन केस धुवत असाल तर कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पावसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळते.
केस चांगले सुकल्यानंतर केस विंचरून घ्या. तसेच केसांना नारळाचे तेल जरूर लावा. नारळाच्या तेलात थोडासा लिंबूचा रस पिळून ते केसांच्या मुळाशी लावून मसाज केल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.
पावसाच्या दिवसांत आठवड्यातून एकदा अथवा दोन वेळा कोमट पाण्याने मसाज केले पाहिजे. यामुळे केस चांगले राहतील. लक्षात ठेवा की पावसाच्या दिवसांत केस ओले राहता कामा नये नाहीतर केसांना वास येतो. तसेच केस मोठ्या प्रमाणात गळतात.
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…