Hair Tips: पावसात केस भिजल्यास लगेच करा हे काम, नाहीतर होईल त्रास

मुंबई: पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. या मोसमात प्रत्येकाला आपले आरोग्य, त्वचा तसेच केसांची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही याची काळजी घेतली नाही तर यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.



पावसाळ्यामध्ये केस गळती


पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच केसगळती आणि त्वचेशी संबंधित समस्या होऊ लागतात. जर तुम्ही या मोसमात भिजत असाल तर भिजल्यानंतर तुमच्या केसांची योग्य ती काळजी घ्या. जर तुम्ही नीट काळजी घेतली नाही तर केस गळू लागतील आणि खराबही होऊ शकतात.



पावसाच्या दिवसांत अशी घ्या काळजी


जाणून घेऊया पावसाच्या दिवसांत आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी. जेव्हा पावसाने तुमचे केस भिजतील तेव्हा घरी येऊन आपले केस शँपूने चांगले धुवा आणि सुकवा. जेव्हा तुम्ही शँपू कराल तेव्हा बोटांच्या मदतीने हलक्या हातांनी स्काल्पला मसाज करा. यामुळे केसांमध्ये जमलेली घाण स्वच्छ होईल.



कंडिशनरचा करा वापर


पावसाच्या दिवशी शँपू केल्यानंतर हेअर कंडिशनरचा वापर जरूर करा. यामुळे रूक्ष आणि निस्तेज झालेले केस सिल्की आणि सॉफ्ट दिसतील. आठवड्यातून एकदा अथवा दोनवेळा हेअर कंडिशनरचा जरूर वापर करा.



कोमट पाण्याचा वापर


जर तुम्ही पावसामुळे भिजलात आणि घरी येऊन केस धुवत असाल तर कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पावसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळते.



नारळाच्या तेलाचा वापर


केस चांगले सुकल्यानंतर केस विंचरून घ्या. तसेच केसांना नारळाचे तेल जरूर लावा. नारळाच्या तेलात थोडासा लिंबूचा रस पिळून ते केसांच्या मुळाशी लावून मसाज केल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.


पावसाच्या दिवसांत आठवड्यातून एकदा अथवा दोन वेळा कोमट पाण्याने मसाज केले पाहिजे. यामुळे केस चांगले राहतील. लक्षात ठेवा की पावसाच्या दिवसांत केस ओले राहता कामा नये नाहीतर केसांना वास येतो. तसेच केस मोठ्या प्रमाणात गळतात.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण