Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील भोलेबाबाचा गलिच्छ प्रकार उघडकीस!

भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद


लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा (Bholebaba) फरार झाले होते. त्यांचा फोनही बंद होता. पोलीस या फरार भोलेबाबाचा शोध घेत असताना त्याचा एक गलिच्छ प्रकार उघडकीस आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा याच्याबाबतीत एकामागोमाग एक खुलासे होत असताना गावकऱ्यांच्या मदतीने एक मोठी माहिती समोर आली आहे. हा भोलेबाबा दुधाने अंघोळ करुन त्या दुधाची खीर बनवून भाविकांना प्रसाद म्हणून वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार त्याच्या गावातील नागरिकांनी पोलिसांना सांगितला. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येता गावकऱ्यांनी भोलेबाबाला विरोध केला. तसेच त्याच्यापासून नागरिकांनी अंतर ठेवायलाही सुरुवात केली.


दरम्यान, फरार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भोलेबाबाने चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करुन आपली प्रतिक्रिया दिली. मात्र या दुधाच्या खीर प्रकरणी सर्व नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचसोबत पोलीस भोलेबाबाचा आणखी तपास करत आहेत.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून