Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील भोलेबाबाचा गलिच्छ प्रकार उघडकीस!

भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद


लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा (Bholebaba) फरार झाले होते. त्यांचा फोनही बंद होता. पोलीस या फरार भोलेबाबाचा शोध घेत असताना त्याचा एक गलिच्छ प्रकार उघडकीस आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा याच्याबाबतीत एकामागोमाग एक खुलासे होत असताना गावकऱ्यांच्या मदतीने एक मोठी माहिती समोर आली आहे. हा भोलेबाबा दुधाने अंघोळ करुन त्या दुधाची खीर बनवून भाविकांना प्रसाद म्हणून वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार त्याच्या गावातील नागरिकांनी पोलिसांना सांगितला. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येता गावकऱ्यांनी भोलेबाबाला विरोध केला. तसेच त्याच्यापासून नागरिकांनी अंतर ठेवायलाही सुरुवात केली.


दरम्यान, फरार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भोलेबाबाने चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करुन आपली प्रतिक्रिया दिली. मात्र या दुधाच्या खीर प्रकरणी सर्व नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचसोबत पोलीस भोलेबाबाचा आणखी तपास करत आहेत.

Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची