लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा (Bholebaba) फरार झाले होते. त्यांचा फोनही बंद होता. पोलीस या फरार भोलेबाबाचा शोध घेत असताना त्याचा एक गलिच्छ प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा याच्याबाबतीत एकामागोमाग एक खुलासे होत असताना गावकऱ्यांच्या मदतीने एक मोठी माहिती समोर आली आहे. हा भोलेबाबा दुधाने अंघोळ करुन त्या दुधाची खीर बनवून भाविकांना प्रसाद म्हणून वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार त्याच्या गावातील नागरिकांनी पोलिसांना सांगितला. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येता गावकऱ्यांनी भोलेबाबाला विरोध केला. तसेच त्याच्यापासून नागरिकांनी अंतर ठेवायलाही सुरुवात केली.
दरम्यान, फरार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भोलेबाबाने चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करुन आपली प्रतिक्रिया दिली. मात्र या दुधाच्या खीर प्रकरणी सर्व नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचसोबत पोलीस भोलेबाबाचा आणखी तपास करत आहेत.
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…
मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…
मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह…
मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक…
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या…