Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

  56

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या लाखो चाहत्यांनी अ‍ॅम्ब्युलन्सल वाट करून देत मानवतेचे दर्शन दिले.


लाखोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीने अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देत मानवतेचे तसेच धैर्यतेचे दर्शन दिले. लोकांनी बाजूला होत अ‍ॅम्ब्युलन्सला मोकळी वाट करून दिली. यावरून मुंबईकरांच्या एकतेचे दर्शन पाहायला मिळाले. तसेच एखाद्याच्या मदतीसाठी लाखो लोक मानसिकरित्या कसे एकत्र येऊ शकतात हे ही या कृतीतून दिसले.


 


टीम इंडियाने २९ जूनला खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकांत रोमहर्षक पद्धतीने हरवले होते. यासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने इतिहास रचला. भारताने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपचा खिताब आपल्या नावे केला. १३ वर्षांनी आयसीसी वर्ल्डकप ट्रॉफी भारतात आली.


याआधी २०११मध्ये भारताने ५० षटकांचा वर्ल्डकप आपल्या नावे केला होता. भारतात पोहोचताच सगळ्यात आधी टीम इंडिया दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटली. यानंतर संध्याकाळी ते विजयी परेडसाठी मुंबईत पोहोचले. येथे त्यांचे भव्य स्वागत केले जात आहे.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी