Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने चाहते जमा झाले आहेत.


ही विजयी परेड मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत असणार आहे. दरम्यान, मरीन ड्राईव्हवर लाखोंच्या संख्येने चाहते पोहोचले आहे.


भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४चा खिताब जिंकत सकाळीच दिल्लीत दाखल झाला. टीम इंडिया एअरपोर्टवर सरळ हॉटेलला गेली. येथे चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. टीम इंडियासाठी गुरूवारचा दिवस हा व्यस्त आहे.






टीम इंडियाने सगळ्यात आधी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर संघ मुंबईसाठी रवाना झाला. ओपन बसमधून टीम इंडियाची विजयी परेड काढण्यात आली आहे.


टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप २०२४च्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत खिताब पटकावला होता. फायनल सामना अतिशय अटीतटीचा रंगला होता. या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. याआधी २००७मध्ये भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळीही धोनी अँड कंपनीचे मुंबईत जोरदार स्वागत झाले होते.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख