Team india: टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन टीम इंडिया भारतात दाखल

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) जिंकल्यानंतर आज मायदेशात परतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया बार्बाडोस येथून घरी परतली आहे. भारताने स्पर्धेच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत खिताब आपल्या नावे केला होता. फायनल जिंकल्यानंतर टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती.


आता त्यांना स्पेशल फ्लाईटने भारतात परत आणण्यात आले. फ्लाईड दिल्ली येथे लँड झाली. एअर इंडियाच्या AIC24WC चार्टर्ड फ्लाईट चॅम्पियन्स आणि स्पोर्ट्स स्टाफला घेऊन आली. भारतात आल्यानंतर टीम इंडियाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे.


आल्यानंतर रोहित अँड कंपनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतील. टीम इंडियाची पंतप्रधान मोदींशी भेट सकाळी ९ वाजता होईल. त्यानंतर टीम इंडिया दुसर्‍या चार्टर्ड फ्लाईटने मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईत भारतीय संघ ओपन बस परेड करणार आहे. याआधी धोनी अँड कंपनीने २००७मध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर विजयी परेड केली होती.


परेडची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. ही परेड संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर असणार आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये प्रेझेंटेशन सेरेमनी असणार आहे.


टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील स्पर्धेचा अंतिम सामना २९ जून शनिवारी बार्बाडोसच्या केसिंग्टन ओव्हल मैदानात खेळवण्यात आला होता. यानंतर बार्बाडोसमध्ये वादळ आले होते. यामुळे टीम इंडिया तेथे अडकली होती. तीन दिवस त्यांना तेथे राहावे लागले. बार्बाडोसमध्ये वादळाचा प्रकोप इतका होता की तेथील एअरपोर्ट बंद करण्यात आले होते. तसेच कर्फ्यूची स्थिती निर्माण झाली होती.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या