Team india: टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन टीम इंडिया भारतात दाखल

  70

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) जिंकल्यानंतर आज मायदेशात परतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया बार्बाडोस येथून घरी परतली आहे. भारताने स्पर्धेच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत खिताब आपल्या नावे केला होता. फायनल जिंकल्यानंतर टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती.


आता त्यांना स्पेशल फ्लाईटने भारतात परत आणण्यात आले. फ्लाईड दिल्ली येथे लँड झाली. एअर इंडियाच्या AIC24WC चार्टर्ड फ्लाईट चॅम्पियन्स आणि स्पोर्ट्स स्टाफला घेऊन आली. भारतात आल्यानंतर टीम इंडियाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे.


आल्यानंतर रोहित अँड कंपनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतील. टीम इंडियाची पंतप्रधान मोदींशी भेट सकाळी ९ वाजता होईल. त्यानंतर टीम इंडिया दुसर्‍या चार्टर्ड फ्लाईटने मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईत भारतीय संघ ओपन बस परेड करणार आहे. याआधी धोनी अँड कंपनीने २००७मध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर विजयी परेड केली होती.


परेडची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. ही परेड संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर असणार आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये प्रेझेंटेशन सेरेमनी असणार आहे.


टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील स्पर्धेचा अंतिम सामना २९ जून शनिवारी बार्बाडोसच्या केसिंग्टन ओव्हल मैदानात खेळवण्यात आला होता. यानंतर बार्बाडोसमध्ये वादळ आले होते. यामुळे टीम इंडिया तेथे अडकली होती. तीन दिवस त्यांना तेथे राहावे लागले. बार्बाडोसमध्ये वादळाचा प्रकोप इतका होता की तेथील एअरपोर्ट बंद करण्यात आले होते. तसेच कर्फ्यूची स्थिती निर्माण झाली होती.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र