Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

  67

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या स्वागताला हजेरी लावली होती. मरिन ड्राईव्ह येथे टीम इंडियाच्या खेळाडूंची विजयी परेड निघाली होती.


या विजयी परेडनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमला हजेरी लावली. येथेही खेळाडूंनी जोरदार डान्स केला. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मासह अनेक खेळाडू यावेळी डान्स करताना दिसले.


दरम्यान, विश्वविजेत्या संघावर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. बीसीसीआयनेही या खेळाडूंचे कौतुक म्हणून भव्य बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी तब्बल १२५ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.


बीसीसीआयने वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाला १२५ कोटींचा चेक दिला. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. टीम इंडियाने यावेळी चाहत्यांनाही धन्यवाद दिले. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना धन्यवाद देण्यासाठी हातात ट्रॉफी घेत स्टेडियमला फेरी मारली. यावेळी टीम इंडियाचे खेळाडू प्रेक्षकांच्या दिशेने टेनिस बॉल फेकत होते.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी