T20 World cup : विश्वविजेत्या टीम इंडियाला प्रत्यक्ष पाहायचंय? मग 'या' वेळेपूर्वी मरीन ड्राईव्हला पोहोचा!

नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत निघणार ओपन बसमधून मिरवणूक


मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket team) तब्बल १३ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ (T20 world cup 2024) जिंकल्यामुळे देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. यानंतर आज टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात बार्बाडोस येथून मायदेशात परतली आहे. आज पहाटे टीम दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) दाखल झाली. यानंतर ते आज ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. त्यांना पाहण्यासाठी चाहते आधीच उत्सुक झाले आहेत. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत (Nariman point to Wankhede stadium) ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक पाहायची असेल तर मुंबईकरांना 'या' वेळेच्या आत मरीन ड्राईव्हला (Marine drive) पोहोचावं लागणार आहे.


ओपन बसमधून टीम इंडियाच्या मिरवणुकीसाठी मुंबई पोलीस (Mumbai police) सज्ज आहे. सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. वानखेडे स्टेडियमसह शोभायात्रेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या शोभयात्रेनिमित्त पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वाहतूक मार्गातही काही बदल करण्यात आले आहेत. शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर एन.एस मार्गाची उत्तर व दक्षिण वाहिनी एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतूक बंद करण्यात येणार आहे.


२००७ मध्ये पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगज्जेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक निघाली होती. तब्बल आठ तास चाललेल्या विश्वविजयी मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा एकदा भारताने टी २० विश्वचषकावर नाव कोरलेय. विश्वविजेत्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईकर सज्ज झाले आहेत.



वाहतूक मार्गात कोणते बदल?


वीर नरीमन रोड चर्चगेटपासून किलाचंद चौकपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दिनशॉ वाच्छा मार्ग डब्ल्यू आय.ए चौकपासून रतनलाल बुबनाचौकापर्यंत वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच हुतात्मा चौकापासून वेणूताई चव्हाण चौकापर्यंत मादाम कामा रोड बंद ठेवण्यात येणार आहे. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग व विनय शहा मार्गही वाहतुकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहेत.


कोस्टल मार्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरील सर्व मार्गांवर वाहने उभी करण्यास रुग्णावाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दल व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहने वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.



किती वाजता पोहोचावं लागेल?


शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी ४:३० वाजण्यापूर्वी मरीन ड्राईव्ह येथे सहभागी व्हावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वानखेडे स्टेडिअमच्या आतही विजयी शोभायात्रा होणार आहे. त्यासाठी चाहत्यांनी सहा वाजण्याच्या आत वानखडे स्टेडिअममध्ये प्रवेश करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेय. कार्यक्रमासाठी येणाऱ्या चाहत्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महापालिका आयुक्त भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची घेतली काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्य समस्यांपासून

Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच

CM Student Science Wari : 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाला शासनाची मान्यता

मुंबई : ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट

Gymkhana : राज्यातील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याबाबत लवकरच नवीन धोरण

मुंबई : मुंबई शहरासह संपूर्ण राज्यातील शासकीय जमिनींवर उभारण्यात आलेल्या जिमखान्यांचे भाडेपट्टे संपुष्टात

मुंबई वॉटर मेट्रोच्या आराखड्याला गती ,मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि नवी मुंबई विमानतळ स्थानकांचा समावेश मुंबई : मुंबईकरांना गर्दी आणि वाहतूक

BMCT : बीएमसीटीमध्ये ११३ स्थानिक सुरक्षारक्षकांना कामावरून कमी; विधानसभा उपाध्यक्षांनी मागविला अहवाल

मुंबई : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येथे कार्यरत असलेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ११३ सुरक्षारक्षक