T20 World cup : विश्वविजेत्या टीम इंडियाला प्रत्यक्ष पाहायचंय? मग 'या' वेळेपूर्वी मरीन ड्राईव्हला पोहोचा!

नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत निघणार ओपन बसमधून मिरवणूक


मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket team) तब्बल १३ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ (T20 world cup 2024) जिंकल्यामुळे देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. यानंतर आज टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात बार्बाडोस येथून मायदेशात परतली आहे. आज पहाटे टीम दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) दाखल झाली. यानंतर ते आज ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. त्यांना पाहण्यासाठी चाहते आधीच उत्सुक झाले आहेत. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत (Nariman point to Wankhede stadium) ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक पाहायची असेल तर मुंबईकरांना 'या' वेळेच्या आत मरीन ड्राईव्हला (Marine drive) पोहोचावं लागणार आहे.


ओपन बसमधून टीम इंडियाच्या मिरवणुकीसाठी मुंबई पोलीस (Mumbai police) सज्ज आहे. सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. वानखेडे स्टेडियमसह शोभायात्रेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या शोभयात्रेनिमित्त पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वाहतूक मार्गातही काही बदल करण्यात आले आहेत. शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर एन.एस मार्गाची उत्तर व दक्षिण वाहिनी एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतूक बंद करण्यात येणार आहे.


२००७ मध्ये पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगज्जेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक निघाली होती. तब्बल आठ तास चाललेल्या विश्वविजयी मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा एकदा भारताने टी २० विश्वचषकावर नाव कोरलेय. विश्वविजेत्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईकर सज्ज झाले आहेत.



वाहतूक मार्गात कोणते बदल?


वीर नरीमन रोड चर्चगेटपासून किलाचंद चौकपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दिनशॉ वाच्छा मार्ग डब्ल्यू आय.ए चौकपासून रतनलाल बुबनाचौकापर्यंत वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच हुतात्मा चौकापासून वेणूताई चव्हाण चौकापर्यंत मादाम कामा रोड बंद ठेवण्यात येणार आहे. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग व विनय शहा मार्गही वाहतुकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहेत.


कोस्टल मार्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरील सर्व मार्गांवर वाहने उभी करण्यास रुग्णावाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दल व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहने वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.



किती वाजता पोहोचावं लागेल?


शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी ४:३० वाजण्यापूर्वी मरीन ड्राईव्ह येथे सहभागी व्हावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वानखेडे स्टेडिअमच्या आतही विजयी शोभायात्रा होणार आहे. त्यासाठी चाहत्यांनी सहा वाजण्याच्या आत वानखडे स्टेडिअममध्ये प्रवेश करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेय. कार्यक्रमासाठी येणाऱ्या चाहत्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण