Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले जाते. ज्योतिषानुसार यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. जेव्हा आपण एखाद्या खास कामासाठी घराबाहेर जाते. जसे प्रवासाला निघणे, परीक्षेसाठी अथवा इंटरव्ह्यूसाठी जातो तेव्हा घरातून निघण्याआधी हातावर दही-साखर ठेवली जाते.


अनेकदा तुमची आई, आजीनेही असे केले असेल. मात्र खरंच दही-साखर खाणे शुभ असते का?जाणून घेऊया या मागचे लॉजिक


खरंतर हिंदू धर्मात पाच अमृत तत्वांपैकी एक मानले गेले आहे. यामुळे दहीचे महत्त्व वाढते. अनेक धार्मिक कार्यांमध्ये दह्याचा वापर केला जातो. पंचामृतांमध्ये दही महत्त्वाचे आहे. भगवान शंकरालाही दहीने अभिषेक केला जातो.


ज्योतिषानुसार दही आणि साखर या दोन्हींचा रंग सफेद असतो. सफेद रंगाचा संबंध चंद्राशी असतो. अशातच दही आणि साखर खाल्ल्याने चंद्र ग्रहाकडून शुभ फल प्राप्ती होते.


चंद्राची स्थिती मजबूत झाल्याने कुंडलीतील भाग्य पक्ष मजबूत होतो आणि डोकेही थंड राहते. यामुळे व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते.


सोबतच दही-साखर खाणे हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण दह्यामध्ये विविध प्रकारचे व्हिटामिन्स असतात ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तर साखरेमध्ये ग्लुकोज असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

Comments
Add Comment

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष