Morning Tips: महिलांनी सकाळी उठल्यावर ही कामे करू नये, घ्या जाणून

मुंबई: सकाळी उठताच आपल्या दिवसाची नवी सुरूवात होते. संपूर्ण दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी शुभ असेल की नाही हे तुमच्या कार्यावर अवलंबून असते. याच कारणामुळे शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी सकाळी उठून करू नये. यामुळे संपूर्ण दिवस अशुभ जाऊ शकतो.


महिलांनी सकाळी उठल्यावर विशेष करून काही कामे करू नयेत. याचे कारण आहे की महिलांना घरची लक्ष्मी मानली जाते. घराची आर्थिक परिस्थिती, आनंद, समृद्धी हे स्त्रीशी संबंधित असते. यामुळेच स्त्रीने केलेल्या कामाचा प्रभाव घर-कुटुंबावर होतो.



करू नका ही कामे


उंबऱ्यावर बसू नका


महिलांनी सकाळी उठल्यावर उंबऱ्यावर बसू नये. शास्त्रानुसर सकाळच्या वेळेस उंबऱ्यावर बसल्याने घराची समृद्धी निघून जाते.



वाद घालू नका


लक्ष्मी मातेचा त्याच घरात प्रवेश होतो जेथे आनंद आणि शांती असते. यामुळे सकाळी सकाळी वाद घालू नका.



आरसा पाहू नका


अनेक महिला सकाळी उठताच आरशात स्वत:ला पाहतात. मात्र शास्त्रात हे योग्य नाही सांगितले आहे. असे केल्याने तुमच्यामध्ये नकारात्मकतेचा प्रवेश होऊ शकतो.



सावली पाहू नका


आरशासोबत महिलांनी सकाळी उठल्यावर आपली सावलीही पाहू नये. याचे कारण आहे सूर्योदय पूर्व दिशेने होतो. तसेच पश्चिम दिशेला पाहिलेली सावली वास्तुशास्त्रात राहूचे संकेत मानले जातात.



भाग्याला कोसणे


अनेक महिला सकाळी उठल्यावर आपल्या नशिबाला बोल लावत असतात. मात्र तुमच्या या सवयीने लक्ष्मी माता नाराज होऊ शकते.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे