Jio, Airtel आणि Vi ने वाढवले रिचार्जचे दर, मात्र ही कंपनी देतेय स्वस्त रिचार्ज

मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. या तीनही खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्समध्ये अपडेशन केले आहे. यामुळे युजर्सच्या मोबाईल फोन बिलात चांगलीच वाढ होणार आहे. या कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमती ६०० रूपयांपर्यंत वाढवल्या आहेत.


दरम्यान, एक टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने मात्र आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केलेली नाही. आम्ही बोलत आहोत BSNL बद्दल. पब्लिक सेक्टरमधील ही कंपनी अद्याप जुन्या किंमतीवर रिचार्ज प्लान्स देत आहे. कंपनीने यात कोणतीही वाढ केलेली नाही.



BSNLच्या स्वस्त प्लानची यादी


जर तुम्हाला कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटीचा प्लान हवा असेल तर BSNLचा १०७ रूपयांचा प्लान तुम्ही ट्राय करू शकता. हा प्लान ३५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात ग्राहकांना ३ जीबी डेटा आणि २०० फ्री व्हॉईस कॉलिंग मिनिट्स मिळतात.


यानंतर १४७ रूपयांचा प्लान मिळेल. यात ग्राहकांना ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान १० जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देतो. याशिवाय कंपनीचा १५३ रूपयांचा प्लानही आहे यात २६ दिवस व्हॅलिडिटी असते.


या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, २६ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच कंपनीचा २९८ रूपयांच्या प्लानमध्ये युजरला १ जीबी डेटा दररोज, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएएमस मिळतात. हा प्लान ५२ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.


Comments

Rajendra    July 8, 2024 05:56 PM

BSNL is government sector this is one of the good news that BSNL has not increase their recharge rates but BSNL has not upgrade their frequency vi jio Airtel companies has upgraded their frequency from 4G to 5G if government improved in BSNL frequency up to 5G then many peoples with use that government Sim

Add Comment

Chembur Monorail : चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल पुन्हा धावणार; सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं, प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार

मुंबई : मुंबईतील चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल (Monorail) मार्गिका पुन्हा सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या

Political News: दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत

High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४

BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश मुंबई :