Jio, Airtel आणि Vi ने वाढवले रिचार्जचे दर, मात्र ही कंपनी देतेय स्वस्त रिचार्ज

मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. या तीनही खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्समध्ये अपडेशन केले आहे. यामुळे युजर्सच्या मोबाईल फोन बिलात चांगलीच वाढ होणार आहे. या कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमती ६०० रूपयांपर्यंत वाढवल्या आहेत.


दरम्यान, एक टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने मात्र आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केलेली नाही. आम्ही बोलत आहोत BSNL बद्दल. पब्लिक सेक्टरमधील ही कंपनी अद्याप जुन्या किंमतीवर रिचार्ज प्लान्स देत आहे. कंपनीने यात कोणतीही वाढ केलेली नाही.



BSNLच्या स्वस्त प्लानची यादी


जर तुम्हाला कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटीचा प्लान हवा असेल तर BSNLचा १०७ रूपयांचा प्लान तुम्ही ट्राय करू शकता. हा प्लान ३५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात ग्राहकांना ३ जीबी डेटा आणि २०० फ्री व्हॉईस कॉलिंग मिनिट्स मिळतात.


यानंतर १४७ रूपयांचा प्लान मिळेल. यात ग्राहकांना ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान १० जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देतो. याशिवाय कंपनीचा १५३ रूपयांचा प्लानही आहे यात २६ दिवस व्हॅलिडिटी असते.


या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, २६ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच कंपनीचा २९८ रूपयांच्या प्लानमध्ये युजरला १ जीबी डेटा दररोज, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएएमस मिळतात. हा प्लान ५२ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.


Comments

Rajendra    July 8, 2024 05:56 PM

BSNL is government sector this is one of the good news that BSNL has not increase their recharge rates but BSNL has not upgrade their frequency vi jio Airtel companies has upgraded their frequency from 4G to 5G if government improved in BSNL frequency up to 5G then many peoples with use that government Sim

Add Comment

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Mumbai News : मुंबईतील जुन्या भागांचे रूप पालटणार

म्हाडाचे ९२५ एकरांवर ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ४ लाख कोटींची होणार गुंतवणूक मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील

Minister Shivendrasinhraje Bhosale : रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य; आंबेनळी घाटासह अपघातप्रवण मार्गांवर विशेष उपाययोजना

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभेत माहिती मुंबई : राज्यातील नागरिकांना

Uday Samant : सिंधुदुर्गमध्ये 'मालवणी भाषा भवन' उभारणार

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : कोकणची समृद्ध संस्कृती

Chandrashekhar Bawankule : राज्यात आणखी ८८ नवी महसूल कार्यालये

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; हरकती-सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना जारी मुंबई : राज्यातील

पोक्रा' योजनेत पोलादपूरचा समावेश आता अशक्य; आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रश्नावर मंत्री आशिष जयस्वाल यांचं उत्तर

मुंबई : जागतिक बँकेच्या कडक अटी आणि करारातील तांत्रिक बाबींमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा