Jio, Airtel आणि Vi ने वाढवले रिचार्जचे दर, मात्र ही कंपनी देतेय स्वस्त रिचार्ज

मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. या तीनही खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्समध्ये अपडेशन केले आहे. यामुळे युजर्सच्या मोबाईल फोन बिलात चांगलीच वाढ होणार आहे. या कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमती ६०० रूपयांपर्यंत वाढवल्या आहेत.


दरम्यान, एक टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने मात्र आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केलेली नाही. आम्ही बोलत आहोत BSNL बद्दल. पब्लिक सेक्टरमधील ही कंपनी अद्याप जुन्या किंमतीवर रिचार्ज प्लान्स देत आहे. कंपनीने यात कोणतीही वाढ केलेली नाही.



BSNLच्या स्वस्त प्लानची यादी


जर तुम्हाला कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटीचा प्लान हवा असेल तर BSNLचा १०७ रूपयांचा प्लान तुम्ही ट्राय करू शकता. हा प्लान ३५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात ग्राहकांना ३ जीबी डेटा आणि २०० फ्री व्हॉईस कॉलिंग मिनिट्स मिळतात.


यानंतर १४७ रूपयांचा प्लान मिळेल. यात ग्राहकांना ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान १० जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देतो. याशिवाय कंपनीचा १५३ रूपयांचा प्लानही आहे यात २६ दिवस व्हॅलिडिटी असते.


या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, २६ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच कंपनीचा २९८ रूपयांच्या प्लानमध्ये युजरला १ जीबी डेटा दररोज, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएएमस मिळतात. हा प्लान ५२ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.


Comments

Rajendra    July 8, 2024 05:56 PM

BSNL is government sector this is one of the good news that BSNL has not increase their recharge rates but BSNL has not upgrade their frequency vi jio Airtel companies has upgraded their frequency from 4G to 5G if government improved in BSNL frequency up to 5G then many peoples with use that government Sim

Add Comment

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त