Prakash Mahajan : 'या' महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका!

मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी


मुंबई : राज्य सरकारने (State Government) 'माझी लाडकी बहीण' (Mazi Ladki Bahin) या योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये महिलांसाठी अन्नपूर्ण, पिंक रिक्षा, दरमहा १५०० रुपये मिळणार अशा योजनांचा समावेश आहे. लाडकी बहीण योजना लागू होताच फॉर्म भरण्यासाठी अनेक महिलांची एकच झुंबड उडाली आहे. अशातच मनसेचे (MNS) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी योजनेबाबत मुस्लीम समाजातील ज्या महिलांना दोन पेक्षा अधिक मुले आहेत त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी केली आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने नुसार राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ मुस्लीम समाजातील ज्या महिलांना दोन पेक्षा अधिक मुले आहेत. तसेच ज्या मुस्लीम पुरुषाला एकापेक्षा अधिक पत्नी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, असे स्पष्ट मत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे.



सरकार इतरांच्या बायका सांभाळण्यासाठी नाही


‘सरकार इतरांच्या बायका सांभाळण्यासाठी नाही तर ज्यांना गरज आहे त्या महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण व्हावे, यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली. मात्र सरकारच्या योजनेचा कोणीही चुकीचा फायदा घेतला नाही पाहिजे. विवाहित महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना किती अपत्य आहेत, हे पाहून त्या महिलांना या योजनेचा लाभ द्यावा', असे प्रकाश महाजन यांनी म्हटले. त्यासोबत कोणावर अन्याय करा असे त्यांचे म्हणणे नसून एखाद्या पुरूषाला तीन बायका असतील तर त्या तिघींना सरकार या योजनेचा लाभ देणार का? असा सवालही प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला आहे.

Comments
Add Comment

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या

प्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील फोटो, Video पाठवून मानसिक त्रास, आरोपीला अटक, काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीला फेसबुकवर वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याबद्दल ऑनलाइन छळाची

८वा वेतन आयोग मंजूर पण सरकारी कर्मचारी धास्तावले; कारण काय?

केंद्राचा मोठा निर्णय: पगारवाढीऐवजी आता 'कामकाजावर' वेतन! नवी दिल्ली : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत