Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) आपल्या नावे केला. फायनल सामना २९ जून शनिवारी खेळवण्यात आला होता. यानंतर येथे चक्रवाती वादळामुळे संपूर्ण खेळ बिघडून गेला. त्यामुळे टीम इंडियाला बार्बाडोसमध्येच थांबावे लागले.


वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद झाले आणि तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली. टीम इंडियाला मंगळवारी तेथून निघायचे होते मात्र याला उशीर झाला आहे.


मिडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने टीम इंडियासाठी स्पेशल फ्लाईटची व्यवस्था केली होती. यासाठी त्यांना मंगळवारी निघायचे होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहोचायचे होते. दरम्यान, याला आता उशीर होत आहे.



जिंकला टी-२० वर्ल्डकप खिताब


भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तब्बल १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली. याआधी २००७मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी १७ वर्षे वाट पाहावी लागली.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या