Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) आपल्या नावे केला. फायनल सामना २९ जून शनिवारी खेळवण्यात आला होता. यानंतर येथे चक्रवाती वादळामुळे संपूर्ण खेळ बिघडून गेला. त्यामुळे टीम इंडियाला बार्बाडोसमध्येच थांबावे लागले.


वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद झाले आणि तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली. टीम इंडियाला मंगळवारी तेथून निघायचे होते मात्र याला उशीर झाला आहे.


मिडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने टीम इंडियासाठी स्पेशल फ्लाईटची व्यवस्था केली होती. यासाठी त्यांना मंगळवारी निघायचे होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहोचायचे होते. दरम्यान, याला आता उशीर होत आहे.



जिंकला टी-२० वर्ल्डकप खिताब


भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तब्बल १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली. याआधी २००७मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी १७ वर्षे वाट पाहावी लागली.

Comments
Add Comment

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल