पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत पालघरचे खा.हेमंत सवरा यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे त्यांच्या दालनात भेट घेऊन पालघरवासीयांच्या हालअपेष्टा त्यांच्या कानावर घातल्या.यावेळी सवरा यांनी त्यांना मागण्याचे निवेदन दिले.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर रोड ते तलासरी,या पट्ट्यात महामार्गाचे काम गुणवत्ता पूर्वक झाले नसल्यामुळे त्या कामाची चौकशी करणे,वारंवार पडणारे खड्डे,सतत होणारी वाहतूक कोंडी,निकृष्ट दर्जाचे काम,सर्विस रोड इ. ज्वलंत संमस्यांकडे नितीन गडकरी यांचे त्यांनी लक्ष वेधले. गडकरी यांनी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संबंधितांवर कारवाई करा व कामाचा दर्जा सुधारण्याबाबत ठेकेदाराला कडक शब्दात सूचना करा,अन्यथा कारवाई करा,असे आदेश दिले.
दरम्यान, गडकरी यांच्या आदेशानंतर तरी हा ठेकेदार आपल्या कामात सुधारणा करतो का याकडे पालघर जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…