तुम्ही Jio युजर्स आहात का? तर हे जरूर वाचा

मुंबई: रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्लानचे दर बदलले आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. येथे लोकांना रिचार्ज प्लानची वाढलेली किंमत पाहून नक्कीच धक्का बसू शकतो. यासोबतच एक गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसू शकतो. जिओने नव्या प्लानची यादी जाहीर केली आहे. यात स्पष्टपणे म्हटले आहे की जिओच्या काही प्रीपेड प्लानसोहत अनलिमिटेड ५जी फायदा होणार नाही.


रिलायन्स जिओ केवळ त्याच प्रीपेड प्लानवर अनलिमिटेड ५ जी डेटा देणार आहे जे दर दिवशी २ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा अधिक डेटा वापरतात. याचाच अर्थ दर दिवशी १.५ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा कमी डेटाच्या प्लानमध्ये ५ जी इंटरनेट डेटाची सुविधा मिळणार नाही.



२८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लान ज्यात ५ जी डेटा मिळतो


३४९ रूपयांचा प्लान - आधी याची किंमत २९९ रूपये होती आता यासाठी ३४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.


३९९ रूपयांचा प्लान - आधी या प्लानची किंमत ३४९ रूपये होती त्यासाठी आता ३९९ रूपये द्यावे लागतील. यात दर दिवसाला २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.


४४९ रूपयांचा प्लान - याआधी या प्लानची किंमत ३९९ रूपये होती आता त्यासाठी ४४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतो.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला