तुम्ही Jio युजर्स आहात का? तर हे जरूर वाचा

मुंबई: रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्लानचे दर बदलले आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. येथे लोकांना रिचार्ज प्लानची वाढलेली किंमत पाहून नक्कीच धक्का बसू शकतो. यासोबतच एक गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसू शकतो. जिओने नव्या प्लानची यादी जाहीर केली आहे. यात स्पष्टपणे म्हटले आहे की जिओच्या काही प्रीपेड प्लानसोहत अनलिमिटेड ५जी फायदा होणार नाही.


रिलायन्स जिओ केवळ त्याच प्रीपेड प्लानवर अनलिमिटेड ५ जी डेटा देणार आहे जे दर दिवशी २ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा अधिक डेटा वापरतात. याचाच अर्थ दर दिवशी १.५ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा कमी डेटाच्या प्लानमध्ये ५ जी इंटरनेट डेटाची सुविधा मिळणार नाही.



२८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लान ज्यात ५ जी डेटा मिळतो


३४९ रूपयांचा प्लान - आधी याची किंमत २९९ रूपये होती आता यासाठी ३४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.


३९९ रूपयांचा प्लान - आधी या प्लानची किंमत ३४९ रूपये होती त्यासाठी आता ३९९ रूपये द्यावे लागतील. यात दर दिवसाला २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.


४४९ रूपयांचा प्लान - याआधी या प्लानची किंमत ३९९ रूपये होती आता त्यासाठी ४४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतो.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती