तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले! विराट कोहलीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

Share

बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे, अशा शब्दांत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
विराट कोहलीने अलीकडेच टी-२० विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर पंतप्रधान मोदींनी एक खास पोस्ट केली होती. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना विराट कोहलीने पंतप्रधान मोदींचे आभार मानले. विराट कोहलीने पोस्टमध्ये लिहिले की, आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार, तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. विश्वचषक ट्रॉफी मायदेशात आणणाऱ्या या संघाचा एक भाग असणं, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. यामुळे देशवासीयांना झालेला आनंद पाहून आम्हीही खूप भारावून गेलो आहोत.

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक उंचावल्यानंतर या संघातील सदस्य आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विराटबद्दल पोस्टमध्ये लिहिले होते, “प्रिय विराट कोहली, तुझ्याशी बोलून छान वाटलं. फायनलमधील खेळीप्रमाणे तू सातत्याने भारतासाठी दमदार कामगिरी केली आहेस. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारात तुझ्या बॅटने वर्चस्व गाजवलं आहेस. टी-२० प्रकारात आता तू नसशील पण या प्रकारात तुझं योगदान विसरता येणार नाही. पण मला खात्री आहे की तू नवीन पिढीच्या खेळाडूंना प्रेरणा देत राहशील.

टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी खराब राहिली होती. मात्र त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ७६ धावांची निर्णायक खेळी खेळली. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. विराटच्या या खेळीमुळे भारतीय संघाने सन्मानजनक धावसंख्या उभारली. तसेच या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला चितपट करत विश्वचषक उंचावला. या सामन्यानंतर विराट कोहलीने टी-२० क्रिकेटला अलविदा केला. तसेच रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनीही निवृत्ती जाहीर केली.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

2 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

3 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

4 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

4 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

5 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

6 hours ago