Nitesh Rane : पुन्हा असं केलं तर हिंदू समाजही तिसरा डोळा उघडेल!

आमदार नितेश राणे यांचा राहुल गांधींना कडक इशारा


शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन उद्धव ठाकरे : नितेश राणे


मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी आपल्या भाषणावेळी लोकसभेत भगवान शंकर, कुरान आणि गुरु नानक यांचा फोटो दाखवला. 'जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि २४ तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत', असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. राहुल गांधींच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनीही आक्षेप घेतला. या प्रकरणावर आज भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'राहुल गांधींनी पुन्हा असं केलं तर हिंदू समाज देखील आपला तिसरा डोळा उघडेल', असा घणाघात नितेश राणे यांनी केला.


नितेश राणे म्हणाले, काल देशाच्या संसदेत विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी हिंदू समाजावर जी टीका केली, अपमान केला, त्यानुसार राहुल गांधी कदाचित विसरले असतील की ज्या देशामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्या देशात ९० टक्के हिंदू लोक राहतात. हिंदूराष्ट्र म्हणून आमच्या देशाची ओळख आहे. या देशाचा हिंदू आतापर्यंत शांत आहे, म्हणूनच राहुल गांधी ज्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत होते, ते या देशात सुखाने राहू शकतात. ज्या दिवशी खरंच या देशातील हिंदू अशांत होईल, हिंसक होईल तेव्हा काल ज्यांना राहुल गांधी खूश करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना बिर्याणी आणि शीरखुरमा यांच्यातील फरकही कळणार नाही.


आमच्या देशात हिंदूंचा असा अपमान खपवून घेतला जाणार नाही. परत असं केलं तर हिंदू समाज देखील आपला तिसरा डोळा उघडेल. ज्या प्रकारे त्यांनी गुरुनानक आणि भगवान शंकर यांचा फोटो दाखवला त्याप्रमाणे त्यांनी मोहम्मद पैगंबर यांचा फोटो दाखवण्याची हिंमत का नाही केली? अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.



आमचा हिंदू समाज शांत आहे त्यामुळे...


नितेश राणे म्हणाले, मुळात ज्यांना राहुल गांधींचं वक्तव्य चुकीचं वाटत नाही, त्यांनी याचा विचार केला पाहिजे की आमदार, खासदार, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी याअगोदर ते हिंदू आहेत. हिंदूंचा जो अपमान राहुल गांधींनी केला तेच वक्तव्य जर त्यांनी पाकिस्तानमध्ये केलं असतं तर त्यांची जीभ कापून टाकली असती. आमचा हिंदू समाज शांत आहे त्यामुळे हे सगळं होत आहेत. नाहीतर राहुल गांधींच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या लोकांना खूश करण्याचा प्रयत्न चालू आहे, ते आमच्या देशात १ टक्काही उरणार नाहीत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन उद्धव ठाकरे


धर्मवीर १ मध्ये उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) ५ टक्के वस्त्रहरण झालं, धर्मवीर २ मध्ये उरलेसुरले कपडे काढण्याचं काम पण होईल. मग त्यांना पानं लावायला लागतील. शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन हा उद्धव ठाकरेच आहे बाकी कोणी नाही. उद्धव ठाकरेला बाजूला केलं असतं तर शिवसेना आज एकसंघ असती आणि ताकदीचा पक्ष असती, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या