Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता


मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी नोकरीची सुवर्णसंधी (Government Job) चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court Recruitment) रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत मानधनाच्या नियमांनुसार ही भरती जारी केली असून या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी असल्यामुळे इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा असे सांगण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयात पात्र तरुणांना महाव्यवस्थापक पदासाठी नोकरीची संधी मिळत आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून उमेदवारांना आपले अर्ज https://bombayhighcourt.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. उमेदवारांसाठी ९ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.



वय व शैक्षणिक पात्रता


या नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी आहे. या नोकरीसाठी एमबीए किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. त्यांना ५ वर्षांचा अनुभव आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन, आयटी व्यवस्थापन,एचआर याचे शिक्षण झालेले असावे. सरकारी संस्था किंवा प्रतिष्ठित कंपनीत कामाचा किमान ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.


अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी आहे त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवारांना ५७ हजार ५०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :