Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता


मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी नोकरीची सुवर्णसंधी (Government Job) चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court Recruitment) रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत मानधनाच्या नियमांनुसार ही भरती जारी केली असून या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी असल्यामुळे इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा असे सांगण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयात पात्र तरुणांना महाव्यवस्थापक पदासाठी नोकरीची संधी मिळत आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून उमेदवारांना आपले अर्ज https://bombayhighcourt.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. उमेदवारांसाठी ९ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.



वय व शैक्षणिक पात्रता


या नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी आहे. या नोकरीसाठी एमबीए किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. त्यांना ५ वर्षांचा अनुभव आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन, आयटी व्यवस्थापन,एचआर याचे शिक्षण झालेले असावे. सरकारी संस्था किंवा प्रतिष्ठित कंपनीत कामाचा किमान ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.


अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी आहे त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवारांना ५७ हजार ५०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे