Aditya Thackeray : विधीमंडळात फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी लिफ्टमध्ये...

फडणवीसांनाही हसू अनावर


मुंबई : विधीमंडळात काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची समोरासमोर भेट झाली होती. यावेळी या दोघांनीही एकाच लिफ्टमधून प्रवास केला होता व बातचीतही केली होती. आधीचे साथीदार व आता एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या या दोन नेत्यांच्या लिफ्ट प्रवासामुळे ते पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर नेटकऱ्यांनी अनेक मीम्स व रील्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांचा लिफ्ट प्रवास चांगलाच गाजला. यानंतर आज विधान भवन परिसरात उद्धव ठाकरेंचे पुत्र व उबाठा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची व फडणवीसांची समोरासमोर भेट झाली आणि एक किस्सा घडला. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


विधानभवनाच्या लॉबीत आज दुपारी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची ओझरती भेट झाली. यावेळी फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात हसतखेळत संवाद झाला. आदित्य ठाकरेंना पाहून फडणवीसांनी विचारले की, नमस्कार काय चाललंय? त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी लिफ्टमधून चाललोय. त्यांच्या या वाक्यावर देवेंद्र फडणवीस अगदी मनमोकळेपणाने खळाळून हसले. आदित्य ठाकरेही त्यावर जोरात हसले. यानंतर दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.


निवडणुकीदरम्यान एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्या या दोन नेत्यांमधील जवळीक ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई