Aditya Thackeray : विधीमंडळात फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी लिफ्टमध्ये...

फडणवीसांनाही हसू अनावर


मुंबई : विधीमंडळात काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची समोरासमोर भेट झाली होती. यावेळी या दोघांनीही एकाच लिफ्टमधून प्रवास केला होता व बातचीतही केली होती. आधीचे साथीदार व आता एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या या दोन नेत्यांच्या लिफ्ट प्रवासामुळे ते पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर नेटकऱ्यांनी अनेक मीम्स व रील्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांचा लिफ्ट प्रवास चांगलाच गाजला. यानंतर आज विधान भवन परिसरात उद्धव ठाकरेंचे पुत्र व उबाठा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची व फडणवीसांची समोरासमोर भेट झाली आणि एक किस्सा घडला. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


विधानभवनाच्या लॉबीत आज दुपारी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची ओझरती भेट झाली. यावेळी फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात हसतखेळत संवाद झाला. आदित्य ठाकरेंना पाहून फडणवीसांनी विचारले की, नमस्कार काय चाललंय? त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी लिफ्टमधून चाललोय. त्यांच्या या वाक्यावर देवेंद्र फडणवीस अगदी मनमोकळेपणाने खळाळून हसले. आदित्य ठाकरेही त्यावर जोरात हसले. यानंतर दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.


निवडणुकीदरम्यान एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्या या दोन नेत्यांमधील जवळीक ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास