Yavatmal Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चार जण ठार

इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात 


यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून आता यवतमाळमधूनही एक भयंकर अपघाताची घटना (Yavatmal Accident) समोर आली आहे. इनोव्हा कार ट्रकला धडकल्यामुळे कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज पहाटे यवतमाळ -नागपूर महामार्गावरील (Yavatmal Nagpur Highway) चापरडा गावाजवळ हा अपघात (Road Accident) झाला.


प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये पंजाबमधील एका कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ-नागपूर महामार्गावर एका इनोव्हा गाडीतून हे शीख कुटुंब प्रवास करत होते. हे सर्वजण पंजाबवरुन आले होते. ते नांदेड येथील गुरुद्वारामध्ये चालले होते. त्यांची इनोव्हा कार चारपडा गावाजवळ असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली.


ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. इनोव्हा कारच्या बोनेटचा भाग जोरात धडक झाल्यामुळे ट्रकच्या मागच्या भागात शिरला. त्यामुळे बोनेटचा पत्रा उखडला गेला आणि पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. या गाडीत एअरबॅग्ज नव्हत्या. त्यामुळे चालकासह मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली. या जोरदार धडकेत इनोव्हा कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. या अपघाताचा तपास यवतमाळ पोलिसांकडून (Yavatmal Police) सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली