Tamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि थेट वाहून गेला...

ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार


पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत अशाच पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसोबत होत असलेल्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल लोणावळ्यातील भुशी डॅमच्या (Lonawala Bhushi Dam) मागच्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनाकरता आलेल्या एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच त्यातील एका मृतदेहाचा अद्याप शोधही लागलेला नसताना ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) आणखी एक तरुण वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे. पर्यटनाकरता आलेल्या एका तरुणाने स्टंटबाजीच्या नादात आपला जीव गमावल्याने खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव असून एकूण ३२ जणांच्या आपल्या जिमच्या ग्रुपसोबत तो ताम्हिणी घाटात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आला होता. धबधब्यात पाण्याचा प्रवाह वेगाने असतानाही या तरुणांची मस्ती सुरु होती. त्यातच स्वप्नीलने धाडस म्हणून उंचावरुन पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे तो स्वतःला वाचवू शकला नाही. त्याने पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाह इतका जोरात होता की तो वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.





काहीच दिवसांपूर्वी रील्सच्या नादात तरुण आपला जीव धोक्यात टाकत असल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. ताम्हिणी घाटातही धाडस दाखवण्याच्या नादातच स्वप्नीलला आपला जीव गमवावा लागला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, रोहा-रायगड रेस्क्यू टीम, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. अद्याप त्याचा शोध घेतला जात आहे.


Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरणः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील ९०.८५

Ahilyanagar : धरणांतील पाणी ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव; बेकायदा पाणीउपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar :  एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन धरणांतील

Ahilyanagar : वारीच्या नियोजनासाठी दिंड्यांची माहिती २५ जूनपर्यंत द्या; पाणी बचतीचे मंत्री विखे पाटील यांचे आवाहन

Ahilyanagar : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक

Pavanraje Nimbalkar Murder Case : पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष

पवनराजे हत्याकांडाचा २० वर्षांनंतर निकाल; माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाचे

Kolhapur Shri Mahalakshmi Temple : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; मुख्यमंत्री आणि अमित शहांच्या उपस्थितीत १,४४५ कोटींच्या विकासकामांना सुरुवात

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज

Pavanraje Nimbalkar Murder Case : आरोपींची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलांसह सर्व आरोपी निर्दोष

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या आणि तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे