विराट कोहली, रोहित शर्माची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Share

मुंबई: भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर देत टी-२० वर्ल्डकपवर शिक्कामोर्तब केले. यावरून देशभरात जल्लोष आहे. यातच एक एक करून दोन भारतीय क्रिकेटर्सनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

आधी विराट कोहलीने सांगितले की ही त्याची शेवटची टी-२० मॅच होता. तर काही वेळानंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून याची माहिती दिली. आयसीसीने लिहिले, विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

३७ वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शनिवारी इतिहास रचला. भारताने टी-२० वर्ल्डकप आपल्या नावे केला. यासोबतच भारताने चौथ्यांदा एखादा वर्ल्डकप खिताब जिंकला आहे. भारतीय संघाने फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवले. या विजयासह १४० कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची संधी मिळाली. अखेरपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली. मात्र यानंतर चाहत्यांना कोहली आणि रोहितने टी-२०मधून निवृत्ती घेत झटकाही दिला.

सामन्यानंतर रोहित प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला, हा माझा शेवटचा गेम होता. अलविदा म्हणण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही. मला ही ट्रॉफी हवी होती. मला हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मला हे हवे होते आणि अशेच झाले. आम्ही आनंदाची सीमा यावेळेस पार केली.

कोहलीचाही अलविदा

विराट कोहलीनेही शनिवारी टी-२० फायनल सामना जिंकल्यानंतर म्हटले, हा माझा शेवटचा टी-२० वर्ल्डकप होता. यात आम्हाला विजय मिळवायचा होता. एक दिवस तुम्हाला असे वाटते की तुम्ही धावा करू शकत नाहीत. असे होते. फक्त संधी होती. आता नाही तर कधीच नाही. हा भारतासाठी माझा शेवटचा टी-२० सामना होता.

Recent Posts

जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…

44 seconds ago

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

1 hour ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

2 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago