विराट कोहली, रोहित शर्माची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

मुंबई: भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर देत टी-२० वर्ल्डकपवर शिक्कामोर्तब केले. यावरून देशभरात जल्लोष आहे. यातच एक एक करून दोन भारतीय क्रिकेटर्सनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.


आधी विराट कोहलीने सांगितले की ही त्याची शेवटची टी-२० मॅच होता. तर काही वेळानंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून याची माहिती दिली. आयसीसीने लिहिले, विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.


३७ वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शनिवारी इतिहास रचला. भारताने टी-२० वर्ल्डकप आपल्या नावे केला. यासोबतच भारताने चौथ्यांदा एखादा वर्ल्डकप खिताब जिंकला आहे. भारतीय संघाने फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवले. या विजयासह १४० कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची संधी मिळाली. अखेरपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली. मात्र यानंतर चाहत्यांना कोहली आणि रोहितने टी-२०मधून निवृत्ती घेत झटकाही दिला.


सामन्यानंतर रोहित प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला, हा माझा शेवटचा गेम होता. अलविदा म्हणण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही. मला ही ट्रॉफी हवी होती. मला हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मला हे हवे होते आणि अशेच झाले. आम्ही आनंदाची सीमा यावेळेस पार केली.



कोहलीचाही अलविदा


विराट कोहलीनेही शनिवारी टी-२० फायनल सामना जिंकल्यानंतर म्हटले, हा माझा शेवटचा टी-२० वर्ल्डकप होता. यात आम्हाला विजय मिळवायचा होता. एक दिवस तुम्हाला असे वाटते की तुम्ही धावा करू शकत नाहीत. असे होते. फक्त संधी होती. आता नाही तर कधीच नाही. हा भारतासाठी माझा शेवटचा टी-२० सामना होता.

Comments
Add Comment

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये