विराट कोहली, रोहित शर्माची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

मुंबई: भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर देत टी-२० वर्ल्डकपवर शिक्कामोर्तब केले. यावरून देशभरात जल्लोष आहे. यातच एक एक करून दोन भारतीय क्रिकेटर्सनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.


आधी विराट कोहलीने सांगितले की ही त्याची शेवटची टी-२० मॅच होता. तर काही वेळानंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून याची माहिती दिली. आयसीसीने लिहिले, विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.


३७ वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शनिवारी इतिहास रचला. भारताने टी-२० वर्ल्डकप आपल्या नावे केला. यासोबतच भारताने चौथ्यांदा एखादा वर्ल्डकप खिताब जिंकला आहे. भारतीय संघाने फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवले. या विजयासह १४० कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची संधी मिळाली. अखेरपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली. मात्र यानंतर चाहत्यांना कोहली आणि रोहितने टी-२०मधून निवृत्ती घेत झटकाही दिला.


सामन्यानंतर रोहित प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला, हा माझा शेवटचा गेम होता. अलविदा म्हणण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही. मला ही ट्रॉफी हवी होती. मला हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मला हे हवे होते आणि अशेच झाले. आम्ही आनंदाची सीमा यावेळेस पार केली.



कोहलीचाही अलविदा


विराट कोहलीनेही शनिवारी टी-२० फायनल सामना जिंकल्यानंतर म्हटले, हा माझा शेवटचा टी-२० वर्ल्डकप होता. यात आम्हाला विजय मिळवायचा होता. एक दिवस तुम्हाला असे वाटते की तुम्ही धावा करू शकत नाहीत. असे होते. फक्त संधी होती. आता नाही तर कधीच नाही. हा भारतासाठी माझा शेवटचा टी-२० सामना होता.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए