भेट तुझी माझी स्मरते
अजून त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता,
गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातून
वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती
बाधा भीतीच्या विषाची ।।
क्षुद्र लौकिकाची
खोटी झुगारून नीती ।
नावगाव टाकूनी आली
अशी तुझी प्रीती ।
तुला परी जाणीव
नव्हती तुझ्या साहसाची ।।
केस चिंब ओले होते,
थेंब तुझ्या गाली ।
ओठांवर माझ्या त्यांची
किती फुले झाली ।
श्वासांनी लिहिली
गाथा प्रीतीच्या रसाची ।।
सुगंधीच हळव्या शपथा,
सुगंधीच श्वास ।
स्वप्नातच स्वप्न दिसावे
तसे सर्व भास ।
सुखालाही भोवळ
आली मधुर सुवासाची ।।
नभं उतरू आलं,
चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं,
हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती,
गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती,
सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा,
एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा,
सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू,
उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू,
तुझ्याच पदरा ।।
मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…