IND vs SA: रोहित शर्माच्या या चुकीने भारताला फायनलमध्ये हरवलेच असते मात्र बाजी पलटली आणि...

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत टी-२० वर्ल्डकप २०२४चा खिताब आपल्या नावे केला. या विजयानंतर भारताने ११ वर्षानंतर एखाद्या वर्ल्डकप खिताबाला गवसणी घातली आहे. बारबाडोसच्या केसिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात आलेला सामना खूपच रोमहर्षक राहिला. यात एकावेळेला अशी स्थिती निर्माण झाली होती की टिम इंडिया पराभवाच्या सीमेवर होती. मात्र एकदम बाजी पलटली आणि भारताने विजयश्री खेचून आणली. काय होती कर्णधार रोहित शर्माची चूक?



अक्षर पटेलला १५वे षटक देणे


आफ्रिकेला शेवटच्या ६ षटकांत विजयासाठी ५४ धावांची आवश्यकता होती. क्रीझवर डेविड मिलर आणि हेनरिक क्लासेन स्पिनर्सविरुद्ध चांगला खेळ करत होती. याआधी कुलदीपच्या १४व्या षटकांत १४ धावा आल्या होत्या. आता अशी आशा होती भारताचा कर्णधार १५ वे षटक एखाद्या वेगवान गोलंदाजाला देईल. इतंकच की हार्दिक पांड्याने केवळ एक षटक टाकले होते. दरम्यान, रोहितने अक्षऱकडे चेंडू दिला. त्याच्याआधीच्या ३ षटकांत त्याला २५ धावा मिळाल्या होत्या. अक्षऱला क्लासेनने झोडले आणि त्या षटकातून एकूण २४ धावा निघाल्या.


या ओव्हरनंतर असे वाटत होते की टीम इंडियाने हा सामना गमावला कारण त्यांना शेवटच्या ३० चेंडूत ३० धावा हव्या होत्या आणि क्रीझवर क्लासेनसोबत डेविड मिलरही उपस्थित होता. यानंतर १६वे षटक जसप्रीत बुमराहने टाकले. त्याने केवळ ४ धावा दिल्या आणि आफ्रिकेवरील दबाव वाढवला. हार्दिकने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या बॉलवर हेनरिक क्लासेनला बाद केले. हार्दिकने विकेट घेण्यासोबतच षटकांत केवळ ४ धावा दिल्या.


आता आफ्रिका दबावात आली होती. त्यानंतर १८व्या ओव्हरमध्ये पुन्हा बुमराह आला. त्याने केवळ २ धावा देत १ विकेट घेतली. सामना भारताच्या बाजूने गेला. आता त्यांना २ षटकांत २० धावा हव्या होत्या. दरम्यान डेविड मिलर क्रीझवर होता. १९वी ओव्हर अर्शदीपने टाकली. आता आफ्रिकेला शेवटच्या षटकांत १६ धावा हव्या होत्या.


शेवटची ओव्हर टाकण्यासाठी पुन्हा पांड्या आला. त्याने आपल्या पहिल्याच बॉलवर डेविड मिलरला पॅव्हेलियनला धाडले. मिलरला आऊट करण्यात सगळ्यात मोठे योगदान ठरले ते सूर्यकुमारचे. त्याने जबरदस्त कॅच घेत ही विकेट मिळवली. हार्दिकने या सामन्यात ८ धावा देत २ विकेट मिळवल्या. या पद्धतीने टीम इंडियाने ७ धावांनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

IPL २०२६ : क्या बात ! १५ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम रिंकु सिंहने मोडला

IPL 2026  : सध्या देशात आयपीएल 2026 ची धुमधाम सुरु आहे. आयपीएल म्हणजे अनेक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. जुने रेकॉर्ड

IPL 2026 : आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंगक्रिश रघुवंशीवर दंडात्मक कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा

Sebastian Sawe : केवळ दोन तासांच्या आत मॅरेथॉनचा विक्रम! सेबॅस्टियन सावेचा ऐतिहासिक पराक्रम

केनियाच्या सेबॅस्टियन सावेने लंडन मॅरेथॉन २०२६ मध्ये इतिहास रचला. त्याने १ तास, ५९ मिनिटे आणि ३० सेकंदात मॅरेथॉन

IPL 2026 : अंगक्रिश रघुवंशीची विकेट वादात, 'क्षेत्ररक्षणात अडथळा' म्हणजे काय?

मुंबई : आयपीएल २०२६ चा ३८ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात,

IPL 2026 GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा घरच्याच मैदानावर लाजिरवाणा पराभव!

आयपीएल २०२६ च्या ३७ व्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गुजरातने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर,