IND vs SA: रोहित शर्माच्या या चुकीने भारताला फायनलमध्ये हरवलेच असते मात्र बाजी पलटली आणि...

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत टी-२० वर्ल्डकप २०२४चा खिताब आपल्या नावे केला. या विजयानंतर भारताने ११ वर्षानंतर एखाद्या वर्ल्डकप खिताबाला गवसणी घातली आहे. बारबाडोसच्या केसिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात आलेला सामना खूपच रोमहर्षक राहिला. यात एकावेळेला अशी स्थिती निर्माण झाली होती की टिम इंडिया पराभवाच्या सीमेवर होती. मात्र एकदम बाजी पलटली आणि भारताने विजयश्री खेचून आणली. काय होती कर्णधार रोहित शर्माची चूक?



अक्षर पटेलला १५वे षटक देणे


आफ्रिकेला शेवटच्या ६ षटकांत विजयासाठी ५४ धावांची आवश्यकता होती. क्रीझवर डेविड मिलर आणि हेनरिक क्लासेन स्पिनर्सविरुद्ध चांगला खेळ करत होती. याआधी कुलदीपच्या १४व्या षटकांत १४ धावा आल्या होत्या. आता अशी आशा होती भारताचा कर्णधार १५ वे षटक एखाद्या वेगवान गोलंदाजाला देईल. इतंकच की हार्दिक पांड्याने केवळ एक षटक टाकले होते. दरम्यान, रोहितने अक्षऱकडे चेंडू दिला. त्याच्याआधीच्या ३ षटकांत त्याला २५ धावा मिळाल्या होत्या. अक्षऱला क्लासेनने झोडले आणि त्या षटकातून एकूण २४ धावा निघाल्या.


या ओव्हरनंतर असे वाटत होते की टीम इंडियाने हा सामना गमावला कारण त्यांना शेवटच्या ३० चेंडूत ३० धावा हव्या होत्या आणि क्रीझवर क्लासेनसोबत डेविड मिलरही उपस्थित होता. यानंतर १६वे षटक जसप्रीत बुमराहने टाकले. त्याने केवळ ४ धावा दिल्या आणि आफ्रिकेवरील दबाव वाढवला. हार्दिकने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या बॉलवर हेनरिक क्लासेनला बाद केले. हार्दिकने विकेट घेण्यासोबतच षटकांत केवळ ४ धावा दिल्या.


आता आफ्रिका दबावात आली होती. त्यानंतर १८व्या ओव्हरमध्ये पुन्हा बुमराह आला. त्याने केवळ २ धावा देत १ विकेट घेतली. सामना भारताच्या बाजूने गेला. आता त्यांना २ षटकांत २० धावा हव्या होत्या. दरम्यान डेविड मिलर क्रीझवर होता. १९वी ओव्हर अर्शदीपने टाकली. आता आफ्रिकेला शेवटच्या षटकांत १६ धावा हव्या होत्या.


शेवटची ओव्हर टाकण्यासाठी पुन्हा पांड्या आला. त्याने आपल्या पहिल्याच बॉलवर डेविड मिलरला पॅव्हेलियनला धाडले. मिलरला आऊट करण्यात सगळ्यात मोठे योगदान ठरले ते सूर्यकुमारचे. त्याने जबरदस्त कॅच घेत ही विकेट मिळवली. हार्दिकने या सामन्यात ८ धावा देत २ विकेट मिळवल्या. या पद्धतीने टीम इंडियाने ७ धावांनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

Virat-Rohit Record : रोहित आणि विराटने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारी भारताची पहिली जोडी

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सध्या लंडनच्या

Ind vs Eng : भारताच्या प्लेइंग-११ मध्ये मोठे बदल! जसप्रीत बुमराह संघातून बाहेर; नेमकं कारण काय ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर

FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा आनंद लुटता यावा म्हणून केरळ सरकारने घेतला थेट 'हा' निर्णय 

केरळ : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणार आहे. या स्पर्धेचा परिणाम केरळवरही

FIFA World Cup 2026 : अंतिम सामन्यात अर्जेंटिना-स्पेन आमने सामने; ९६ वर्षांनंतर स्पॅनिश भाषिक देशांमध्ये ऐतिहासिक फायनल सामना

न्यू जर्सी : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात लढत होणार आहे. हा सामना केवळ

PV Sindhu : जपान ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवून रचला इतिहास

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले

Ind vs Eng : भारत - इंग्लंड तिसरी ODI किती वाजता सुरू होणार ? कशी असेल लॉर्ड्सची खेळपट्टी ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर