IND vs SA: रोहित शर्माच्या या चुकीने भारताला फायनलमध्ये हरवलेच असते मात्र बाजी पलटली आणि...

  514

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत टी-२० वर्ल्डकप २०२४चा खिताब आपल्या नावे केला. या विजयानंतर भारताने ११ वर्षानंतर एखाद्या वर्ल्डकप खिताबाला गवसणी घातली आहे. बारबाडोसच्या केसिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात आलेला सामना खूपच रोमहर्षक राहिला. यात एकावेळेला अशी स्थिती निर्माण झाली होती की टिम इंडिया पराभवाच्या सीमेवर होती. मात्र एकदम बाजी पलटली आणि भारताने विजयश्री खेचून आणली. काय होती कर्णधार रोहित शर्माची चूक?



अक्षर पटेलला १५वे षटक देणे


आफ्रिकेला शेवटच्या ६ षटकांत विजयासाठी ५४ धावांची आवश्यकता होती. क्रीझवर डेविड मिलर आणि हेनरिक क्लासेन स्पिनर्सविरुद्ध चांगला खेळ करत होती. याआधी कुलदीपच्या १४व्या षटकांत १४ धावा आल्या होत्या. आता अशी आशा होती भारताचा कर्णधार १५ वे षटक एखाद्या वेगवान गोलंदाजाला देईल. इतंकच की हार्दिक पांड्याने केवळ एक षटक टाकले होते. दरम्यान, रोहितने अक्षऱकडे चेंडू दिला. त्याच्याआधीच्या ३ षटकांत त्याला २५ धावा मिळाल्या होत्या. अक्षऱला क्लासेनने झोडले आणि त्या षटकातून एकूण २४ धावा निघाल्या.


या ओव्हरनंतर असे वाटत होते की टीम इंडियाने हा सामना गमावला कारण त्यांना शेवटच्या ३० चेंडूत ३० धावा हव्या होत्या आणि क्रीझवर क्लासेनसोबत डेविड मिलरही उपस्थित होता. यानंतर १६वे षटक जसप्रीत बुमराहने टाकले. त्याने केवळ ४ धावा दिल्या आणि आफ्रिकेवरील दबाव वाढवला. हार्दिकने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या बॉलवर हेनरिक क्लासेनला बाद केले. हार्दिकने विकेट घेण्यासोबतच षटकांत केवळ ४ धावा दिल्या.


आता आफ्रिका दबावात आली होती. त्यानंतर १८व्या ओव्हरमध्ये पुन्हा बुमराह आला. त्याने केवळ २ धावा देत १ विकेट घेतली. सामना भारताच्या बाजूने गेला. आता त्यांना २ षटकांत २० धावा हव्या होत्या. दरम्यान डेविड मिलर क्रीझवर होता. १९वी ओव्हर अर्शदीपने टाकली. आता आफ्रिकेला शेवटच्या षटकांत १६ धावा हव्या होत्या.


शेवटची ओव्हर टाकण्यासाठी पुन्हा पांड्या आला. त्याने आपल्या पहिल्याच बॉलवर डेविड मिलरला पॅव्हेलियनला धाडले. मिलरला आऊट करण्यात सगळ्यात मोठे योगदान ठरले ते सूर्यकुमारचे. त्याने जबरदस्त कॅच घेत ही विकेट मिळवली. हार्दिकने या सामन्यात ८ धावा देत २ विकेट मिळवल्या. या पद्धतीने टीम इंडियाने ७ धावांनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र