मुंबई: भारताने टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली आहे. भारताने शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवले. तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे.
रोहित शर्माच्या नेतृ्त्वात भारताने इतिहास रचला.. या संघाने इतिहासात चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय संघाने शनिवारी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी मात दिली. या विजयासोबत १४० कोटी भारतीयांना सेलीब्रेशन करण्याची संधी दिली.
भारतीय संघाने २ वेळा वनडे वर्ल्डकप जिंकलाआहे. तर दोनदा टी-२० वर्ल्डकप(२००७, २०२४)खिताब जिंकला आहे. संघाने मागील वर्ल्डकप २०११मध्ये जिंकला होता. त्यानंतर १३ वर्षानंतर कोणताही वर्ल्डकप खिताब जिंकता आला नव्हता.
१७७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका एक वेळेस १५ षटकांत ४ बाद १४७ इतक्या धावांवर होती. येथून त्यांचा विजय पक्का वाटत होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून विजय खेचून आणला.
पहिल्यांदा विराट आणि रोहित यांनी एकत्र खेळताना वर्ल्डकप जिंकला आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…