रोहित शर्माच्या नेतृ्त्वात भारताने इतिहास रचला.. या संघाने इतिहासात चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय संघाने शनिवारी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी मात दिली. या विजयासोबत १४० कोटी भारतीयांना सेलीब्रेशन करण्याची संधी दिली.
भारतीय संघाने २ वेळा वनडे वर्ल्डकप जिंकलाआहे. तर दोनदा टी-२० वर्ल्डकप(२००७, २०२४)खिताब जिंकला आहे. संघाने मागील वर्ल्डकप २०११मध्ये जिंकला होता. त्यानंतर १३ वर्षानंतर कोणताही वर्ल्डकप खिताब जिंकता आला नव्हता.
१७७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका एक वेळेस १५ षटकांत ४ बाद १४७ इतक्या धावांवर होती. येथून त्यांचा विजय पक्का वाटत होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून विजय खेचून आणला.
पहिल्यांदा विराट आणि रोहित यांनी एकत्र खेळताना वर्ल्डकप जिंकला आहे.