IND vs SA: कोहलीचे अर्धशतक, भारताचे द. आफ्रिकेला १७७ धावांचे आव्हान

मुंबई: भारताचा सलामीवीर विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे आव्हान ठेवले आहे. आतापर्यंतच्या वर्ल्डकपच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.


भारताला पहिला धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहित शर्माने जबरदस्त फटकेबाजीस सुरूवात केली खरी मात्र केशव महाराजचा तो बळी ठरला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. सूर्य कुमार यादव मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच रबाडाने त्याला ३ धावांवर बाद केले.


त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलची जोडी जमली. अक्षर पटेलने या सामन्यात ४७ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. तर विराट कोहलीने ७६ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने ५९ चेंडूमध्ये ६ चौकार आणि २ षटकार लगावताना ७६ धावा साकारल्या.


पटेल गेल्यानंतर विराटने शिवम दुबेला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने २७ धावा केल्या. खरंतर शेवटच्या तीन ओव्हरमध्ये चांगल्या धावा करणे गरजेचे होते. मात्र तितक्याशा चांगल्या होऊ शकल्या नाहीत. अखेर भारताची धावसंख्या १७६वर संपुष्टात आली.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण