मुंबई: भारताचा सलामीवीर विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे आव्हान ठेवले आहे. आतापर्यंतच्या वर्ल्डकपच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.
भारताला पहिला धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहित शर्माने जबरदस्त फटकेबाजीस सुरूवात केली खरी मात्र केशव महाराजचा तो बळी ठरला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. सूर्य कुमार यादव मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच रबाडाने त्याला ३ धावांवर बाद केले.
त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलची जोडी जमली. अक्षर पटेलने या सामन्यात ४७ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. तर विराट कोहलीने ७६ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने ५९ चेंडूमध्ये ६ चौकार आणि २ षटकार लगावताना ७६ धावा साकारल्या.
पटेल गेल्यानंतर विराटने शिवम दुबेला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने २७ धावा केल्या. खरंतर शेवटच्या तीन ओव्हरमध्ये चांगल्या धावा करणे गरजेचे होते. मात्र तितक्याशा चांगल्या होऊ शकल्या नाहीत. अखेर भारताची धावसंख्या १७६वर संपुष्टात आली.
नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत निघणार ओपन बसमधून मिरवणूक मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी मुंबई : पुण्याच्या कोथरुड एरंडवणे भागात पहिला झिकाचा (Zika…
कृष्णा नदीकाठी घडला धक्कादायक प्रकार कोल्हार : पावसाळी पर्यटनादरम्यान (Monsoon trip) पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या…
मुंबई: मॉडर्न लाईफस्टाईलमुळे एकीकडे जिथे गोष्टी सोप्या झाल्या आहेत तर दुसरीकडे आपले खाणेपिणे आणि लाईफस्टाईल…
मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. या तीनही खाजगी टेलिकॉम…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) जिंकल्यानंतर आज मायदेशात परतली आहे.…