IND vs SA: कोहलीचे अर्धशतक, भारताचे द. आफ्रिकेला १७७ धावांचे आव्हान

मुंबई: भारताचा सलामीवीर विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे आव्हान ठेवले आहे. आतापर्यंतच्या वर्ल्डकपच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.


भारताला पहिला धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहित शर्माने जबरदस्त फटकेबाजीस सुरूवात केली खरी मात्र केशव महाराजचा तो बळी ठरला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. सूर्य कुमार यादव मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच रबाडाने त्याला ३ धावांवर बाद केले.


त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलची जोडी जमली. अक्षर पटेलने या सामन्यात ४७ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. तर विराट कोहलीने ७६ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने ५९ चेंडूमध्ये ६ चौकार आणि २ षटकार लगावताना ७६ धावा साकारल्या.


पटेल गेल्यानंतर विराटने शिवम दुबेला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने २७ धावा केल्या. खरंतर शेवटच्या तीन ओव्हरमध्ये चांगल्या धावा करणे गरजेचे होते. मात्र तितक्याशा चांगल्या होऊ शकल्या नाहीत. अखेर भारताची धावसंख्या १७६वर संपुष्टात आली.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख