Indian Army : नदीची पातळी वाढल्याने भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात!

दुर्घटनेत ५ जवान शहीद


लेह : कारगिलच्या लेह जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्य दलाच्या (Indian Army) रणगाड्याला (Tank) मोठा अपघात झाला आहे. लेह जिल्ह्यातील मंदिर मोरजवळ टँकचा अपघात झाला असून या दुर्घटनेत ५ जवान शहीद झाले आहेत. नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने टँकला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात झाला. काल याठिकाणी युद्ध सराव सुरू होता. यावेळी रणगाडे नदी ओलांडत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ही दुर्घटना घडली. या रणगाड्यांमध्ये अडकून पाच जवान शहीद झाले.


दौलत बेग ओल्डी हे उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. या भागात अभ्यास दौरा सुरू होता. भारतीय सैन्यदलाचे अनेक टँक्स याठिकाणी आले होते. आज नदी पार करत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे रणगाडा अडकला, ज्यामध्ये असलेले पाच जवान शहीद झाले. या घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे.


दरम्यान, या अपघाताच्या वेळी रणगाड्यामध्ये लष्कराचे पाच जवान उपस्थित होते. यामध्ये एक जेसीओ आणि चार सैनिकांचा समावेश आहे. एक जवान सापडला आहे, तर उर्वरित चार जवानांचा शोध सुरू आहे. दौलत बेग ओल्डी येथे ज्या रणगाड्याला अपघात झाला तो भारतीय लष्कराचा T-72 टँक होता.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी