फायनलमध्ये पोहोचताच रडायला लागला रोहित शर्मा, पाहा Video

  231

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने(indian cricket team) आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) स्थान मिळवले आहे. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये २७ जूनला सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडला ६८ धावांनी हरवले.


सेमीफायनल सामन्यात इंग्लंडला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र त्यांचा संपूर्ण संघ १६.४ षटकांत १०३ धावांवर आटोपला.


हा सामना संपल्यानंतर या विजयी क्षणी रोहित शर्मा अतिशय भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्याला विराट कोहलीने सावरले. रोहित शर्मा ड्रेसिंग रूमध्ये बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेक यूजर्सनी शेअर केला.


 


रोहितने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ३९ चेंडूत ५७ धावा ठोकत भारताला चांगली सुरूवात करून दिली. आता फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.


दक्षिण आफ्रिकाने अफगाणिस्तानला ९ विकेटनी हरवत टी-२० वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. टी-२० वर्ल्डकपचा फायनल सामना २९ जूनला ब्रिजटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. भारताने २००७मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र